कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याची माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

नवी देहली – जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित केल्यानंतर काश्मीरमधून एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी हे कलम हटवण्यात आले होते.
राज्यसभा: अनुच्छेद 370 हटने के बाद घाटी से विस्थापित नहीं हुआ कोई भी कश्मीरी पंडित व हिंदू, गृह मंत्रालय ने दी जानकारी#Article370 #RajyaSabha #kashmiripandit #WinterSession2021https://t.co/fbpLdGsiZe
— Amar Ujala (@AmarUjalaNews) December 8, 2021
नित्यानंद राय म्हणाले की, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार कलम ३७० हटवल्यानंतर येथे एकही दंगल झाली नाही. हे कलम रहित केल्यापासून, म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ पासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात ३६६ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले, तर ८१ सैनिक हुतात्मा झाले. त्या वेळी ९६ लोकांचा मृत्यू झाला.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री