कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याची माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

नवी देहली – जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित केल्यानंतर काश्मीरमधून एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी हे कलम हटवण्यात आले होते.
राज्यसभा: अनुच्छेद 370 हटने के बाद घाटी से विस्थापित नहीं हुआ कोई भी कश्मीरी पंडित व हिंदू, गृह मंत्रालय ने दी जानकारी#Article370 #RajyaSabha #kashmiripandit #WinterSession2021https://t.co/fbpLdGsiZe
— Amar Ujala (@AmarUjalaNews) December 8, 2021
नित्यानंद राय म्हणाले की, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार कलम ३७० हटवल्यानंतर येथे एकही दंगल झाली नाही. हे कलम रहित केल्यापासून, म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ पासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात ३६६ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले, तर ८१ सैनिक हुतात्मा झाले. त्या वेळी ९६ लोकांचा मृत्यू झाला.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh