गोवा : म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्थानातील पादुकांची पेटी फोडणारे २ चोरटे गजाआड !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! रात्री मंदिरांची राखण करायची सोडून झोपलेल्या सुरक्षारक्षकांवरच कारवाई व्हायला हवी !

विरोधकांचे विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ फेब्रुवारी या दिवशी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. ‘कापसाला प्रति क्विंटल १४ सहस्र रुपयांचा भाव मिळालाच पाहिजे’, अशी मागणी विरोधकांनी केली.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचा पहाणी अहवाल सादर करण्याविषयी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकार्‍यांना न्यायालयाचा आदेश !

मूर्तीची स्थिती गंभीर असून त्यासाठी आता पहाणी होऊन जो अहवाल येईल, तो मूर्तीची सत्यस्थिती सांगणारा असावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे.

वाकड (पुणे) येथे जैन संघाची स्थापना !

येथील जैन बांधवांसाठी जैन मंदिराची स्थापना करून त्यांना सहजतेने पूज्य तीर्थंकरांचे दर्शन, भक्ती आणि पूजा यांचा लाभ घेता यावा, या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या वेळी बोलतांना मोदींनी ‘जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा’ असे अभिवादन करून भाषणाला मराठीत प्रारंभ केला.

मंत्रालय आणि विधीमंडळ यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या संख्येने यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना अडवून मंत्रालय आणि विधीमंडळ येथपर्यंत जाऊ दिले नाही.

‘महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक २०२४’ संमत झाले !

पोलिसांच्या बदल्यांत पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान आणि मोटर परिवहन विभाग यांचा समावेश करणारे ‘महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक २०२४’ हे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी मांडले आणि ते विधान परिषदेत संमत झाले.

काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या प्रश्नावरून मांडलेल्या सूत्रांवर भाजपच्या सदस्यांचा आक्षेप !

मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा असून तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे’, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

…तर विधानसभेसह आपण नष्ट होऊ ! – नितेश राणे, आमदार, भाजप

मुंबईमध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे. त्याच्या लगत असलेल्या भिंतींजवळ अनेक अतिक्रमणांतून इमारती उभ्या राहिल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, याकडे सरकारने लक्ष घातले पाहिजे, असे विधान भाजपचे सदस्य नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये केले.

नागरी बँकांच्या धर्तीवर पतसंस्थांना ऊर्जितावस्था द्यावी ! – प्रवीण दरेकर, भाजप आमदार

दरेकर पुढे म्हणाले की, मुंबईतील स्वच्छता कर्मचार्‍यांना केवळ ६ सहस्र रुपये मिळतात. जागतिक निविदा (‘ग्लोबल टेंडर’) काढल्यामुळे ७५ सहस्र स्वच्छता कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड येऊ शकते.