निजामकालीन नोंदींवरून मराठ्यांना कुणबी जातीचे आरक्षण लागू करण्यास सरकार सहमत !

अंतरवाली सराटी येथील ३ सहस्र ३३२ आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासनही सरकारने दिले आहे.

(म्हणे) ‘मंदिरात काही जणांनाच शर्ट काढून प्रवेश देणे, ही अमानवीय प्रथा असून देवासमोर सर्व जण समान आहेत !’-काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्‍वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?

अतिरिक्‍त पोलीस महासंचालकांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली !

जिल्‍ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्‍याचे आदेश राज्‍य सरकारने दिले आहेत. त्‍याचे दायित्‍व अतिरिक्‍त पोलीस महासंचालक संजय सक्‍सेना यांच्‍यावर देण्‍यात आले आहे.

मनोज जरांगे यांच्‍याशी चर्चा अयशस्‍वी, जरांगे यांनी पुन्‍हा दिली ४ दिवसांची मुदत !

मराठवाड्यातील मराठा समाजाला विदर्भाप्रमाणे कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण द्या, यासह इतर मागण्‍यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्‍या ८ दिवसांपासून चालू असलेल्‍या बेमुदत उपोषणावर तोडगा काढण्‍यात सरकारला ५ सप्‍टेंबर या दिवशी अपयश आले आहे.

जालना पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्‍ती !

जालना जिल्‍ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍यांनी ४ सप्‍टेंबर या दिवशी कार्यभार हाती घेतला. ‘सर्वसामान्‍य माणूस म्‍हणून मी काम करतो. मी अंतरवाली सराटी या गावात जाणार असून आंदोलक मनोज जरांगे यांना भेटणार आहे. आंदोलक आणि पोलीस यांच्‍यामध्‍ये झालेले मतभेद दूर करणार आहे’, असे ते म्‍हणाले.

पुणे महापालिकेची पाणीपुरवठा देयकांमध्‍ये पालट करण्‍याची पाटबंधारे विभागाकडे विनंती !

शहरासाठी १६.३६ टी.एम्.सी. पाणी कोटा संमत आहे. त्‍यातून शहरास पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा केला जातो; मात्र पाटबंधारे विभागाकडून घरगुतीऐवजी २० पट अधिक दर आकारून महापालिकेला देयके सादर केली जातात. त्‍यामुळे ४५० कोटी रुपयांचे देयक प्राप्‍त झाले आहे.

चिंबल येथील वादग्रस्त उर्दू शाळा बंद करण्याचा न्यायालयाचा आदेश

शाळेसाठी अवैधरित्या बांधलेली ३ मजली इमारत आली मोडकळीस अवैधरित्या शाळेची इमारत उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

पोलीस हवालदाराकडून पोंबुर्पा येथील विवाहित महिलेचा विनयभंग

‘जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत’, अशी प्रतिमा पोलिसांची बनत असून जनतेमध्ये पोलिसांविषयी अविश्वास निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने पोलिसांना प्रशिक्षण देतांना साधनेद्वारे नैतिकता रुजवणे अपेक्षित आहे !

अनेक मासांनंतर विधानसभेच्या विविध समित्यांच्या बैठका होणार

‘इस्टीमेट्स’ समिती आणि आश्‍वासन समिती यांच्या अनुक्रमे ७ सप्टेंबर अन् १४ सप्टेंबर या दिवशी बैठका होणार आहेत, अशी माहिती विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन यांनी दिली आहे.

राजापूर येथे पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना आंबोली येथे अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना सावंतवाडी पोलिसांनी आंबोली येथे कह्यात घेतले आहे, तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.