
जालना – मराठवाड्यातील मराठा समाजाला विदर्भाप्रमाणे कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या ८ दिवसांपासून चालू असलेल्या बेमुदत उपोषणावर तोडगा काढण्यात सरकारला ५ सप्टेंबर या दिवशी अपयश आले आहे. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकार सकारात्मक निर्णय घेत असल्याने पुन्हा ४ दिवसांची मुदत दिली आहे. आंदोलक बेमुदत उपोषणावर ठाम आहेत.
भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजनांसह ३ मंत्र्यांनी सलग दुसर्या दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अर्धा घंटा चर्चा केली. ‘१ मासाची मुदत द्या. त्यात ठोस निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत उपोषण मागे घ्या’, अशी विनंती महाजन यांनी केली; पण जरांगे स्वतःच्या भूमिकेवर ठाम होते. ‘हवे तर आणखी ४ दिवसांची मुदत देतो; पण अध्यादेश घेऊनच या’, असे त्यांनी सांगितले.
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद