ब्राह्मण संघाच्या वतीने संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे सन्मान !

‘ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका समारंभात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाची नोंद घ्या !

सूर्याविषयी संशोधन करण्यासाठी ‘आदित्य एल्-१’ यानाचे २ सप्टेंबर या दिवशी यशस्वी प्रक्षेपण झाले. आतापर्यंत अमेरिका, जपान, चीन आणि रशिया या देशांनीच सौरमोहिमा पार पाडल्या आहेत.

सोलापूर येथे प्रतिदिन ५ लाख लिटर दूध संकलन असलेल्या केंद्रांची प्रशासनाकडे नोंदणी नाही !

जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख ७९२ लिटर दूध संकलन होते. त्यातील ५ लाख ५०० लिटर दुधाचे संकलन होत असलेल्या प्रकल्पाची जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाही. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. यावर उपाय म्हणून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

७ सप्टेंबरला ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे

‘लाल परी’ची दु:स्थिती !

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतीत पाऊस चालू असतांना चालक एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात बसचे ‘स्टेअरिंग’ घेत बस चालवत असल्याचे दिसते.

धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवा ! – शंभूराज देसाई

संभाव्य टंचाई पहाता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवावा, तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच धरणांमधील पाण्याचे आवर्तन सोडावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

भिवंडी येथील इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू !

भिवंडी येथील गौरीपाडा भागातील एक मजली इमारतीचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर ५ जणांना वाचवण्यात अग्नीशमनदलाला यश आले आहे. मृतांमध्ये ८ मासांच्या मुलीचा समावेश आहे.

द्रमुकने आधी डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांना संपवून दाखवावे ! 

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र, तसेच राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘आपल्याला डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांच्याप्रमाणे सनातन धर्मालाही संपवायचे आहे’, असे विधान ‘सनातन निर्मूलन परिषदे’त केले. 

कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणारी मुले आपली भारतीय संस्कृती विसरतात

कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकणारी मुले निराशेत जात असल्याचे आढळून आले आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणारी मुले आपली भारतीय संस्कृती विसरतात; याउलट सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतात.