आयुर्वेदाला पुनर्वैभव मिळण्यासाठी समर्पित भावनेने काम करा !

आयुर्वेद ही एक साधना आहे. हे ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून त्यासाठी अनुभवाचे ज्ञानही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

संसद आणि न्यायालय यांद्वारे प्रश्न सोडवण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ! – दिलीप देवधर, संघ अभ्यासक आणि विश्लेषक

येणारी २५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ताधारी रहाणार आहे आणि न्यायपालिका अन् संसदीय प्रणाली यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावणार आहे, हीच संघाची भूमिका आहे.

मोदी सरकारने गेल्या ८ वर्षांत भ्रष्टाचार विरहित सुशासन दिले ! – सुरेश हाळवणकर, भाजप

मोदी सरकारने गेल्या ८ वर्षांत जनतेने दाखवलेल्या विश्वासाला समर्पक कामगिरी करत गरीब आणि युवक यांना केंद्रबिंदू मानून विशेष कामगिरी केली, असे ते म्हणाले.

येशू एक मिथक (कल्पना) असून हिंदु धर्म मला आकर्षित करतो ! – प्रसिद्ध लेखक प्रा. पी.ए. वर्गिस

मी कॅथॉलिक म्हणून जन्माला आलो; मात्र आता मी कॅथॉलिक नाही. मला स्वतःहून कळले आहे की, येशू एक मिथक (कल्पना) आहे आणि धर्म पौराणिक आहे. हिंदु धर्म अनेक वर्षांपासून आहे आणि त्याचे अद्वैत तत्त्वज्ञान माझ्यासारख्या वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनाही आकर्षित करत आहे, असे ट्वीट प्रसिद्ध लेखक प्रा. पी.ए. वर्गिस यांनी केले आहे.

पालखी मार्ग आणि पालखी तळावरील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत !

आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची सूचना

बळजोरीने बायबल शिकवणाऱ्या संस्थांनी हिंदूंना सहिष्णू समजू नये ! – ह.भ.प. मदन महाराज तिरमारे

आमची भारतीय संस्कृती महान आहे. मातेसमोर नतमस्तक होण्याची शिकवण आम्हाला आमची संस्कृती शिकवते. मातेवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रसंगी हनुमंतासारखी क्षात्रवृत्ती दाखवण्याची शिकवणही ती देते.

गांधीवादी नव्हे, प्रखर राष्ट्रवादी !

भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !

संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरील गोंधळप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार ! – प्रमोद येवले, कुलगुरु

२ जून या दिवशी झालेल्या परीक्षेच्या वेळी शहरातील विजेंद्र काबरा महाविद्यालय आणि शेंद्रा येथील महाविद्यालय या केंद्रांवर मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थी देण्यात आले होते, तसेच सभागृह तिकीटही परीक्षेच्या काही घंटे अगोदर उपलब्ध न झाल्याने तोंडी आसन क्रमांक सांगण्यात आले.

बनावट अपंगत्वाचा दाखला दिल्याने ससूनमधील संगणक हाताळणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद !

ससून रुग्णालयातील एच्.एम्.आय.एस्. प्रकल्प विभागातील ‘संगणक ऑपरेटर’ सचिन बाजारे यांनी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र देऊन त्या बदल्यात सांग सिंह यांच्याकडून पैसे घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.