मलकापूर-कराडमध्ये मुसळधार पाऊस !

कराड शहरासह मलकापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरामध्ये ढगफुटी झाल्याप्रमाणे रस्त्यावरून पाणी वहात होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

संभाजीनगर येथे महिला पोलिसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हे नोंद !

येथील एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील दुकानांवरील कारवाई मागे घेण्यासाठी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्याशी उद्धट वर्तन करून अरेरावी केली, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसमोर महिला पोलिसाशी गैरवर्तन केले.

तिसर्‍या लाटेसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

जिह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक प्रादुर्भाव होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. आता आम्ही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची पूर्वसिद्धता करत आहोत, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

नागपूर येथे ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र १२२ हून अधिक बाधित आढळले !

जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ची रुग्णसंख्या १ सहस्र १२२ हून अधिक झाली आहे. याचसमवेत ‘म्युकरमायकोसिस’मुळे १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार ! – हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

या दिवशी सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करावे असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

केंद्र सरकारने देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे ! – लेखक प्रा. वसंतराव भालेराव

बाबू गेनू यांच्या जन्मस्थळाला पंतप्रधानांनी भेट देऊन श्रद्धासुमन अर्पण करावे, या मागण्यांचे निवेदन ‘ई-मेल’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सांडला कलश रक्ताचा’ या पुस्तकाचे लेखक प्रा. वसंतराव भालेराव यांनी पाठवले आहे.

दुर्लक्ष‘द्वीप’ !

अरबी समुद्रात केरळच्या जवळ असलेला केंद्रशासित प्रदेश ‘लक्षद्वीप’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. येथील नूतन प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी ४ अधिनियम जारी केले असून संमतीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले आहेत.

औद्योगिक वसाहतीमधील कामगार बंधूंना ‘अन्नदा संस्थे’च्या सहयोगाने आहार साहित्याचे वाटप

गेले अनेक दिवस चालू असलेल्या दळणवळण बंदीमुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. तरी औद्योगिक वसाहतीमधील कामगार बंधूंना साहाय्य म्हणून ‘अन्नदा संस्थे’च्या सहयोगाने आहार साहित्याचे वाटप करण्यात आले.

अंबड (जिल्हा जालना) येथे मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी २ धर्मांधांवर गुन्हे नोंद !

हिंदु मुलींचे अपहरण करून आणि त्यांच्याशी बळजोरीने निकाह करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार आहे ! – संपादक

तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी हवी !

प्रतिवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार ३१ मे या दिवशी ‘जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन’ पाळला गेला. तंबाखूयुक्त पदार्थांचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न झाला आहे.