२१ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १५ दिवसांच्या दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता
२० एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्यासाठी मंत्रीमंडळाचे एकमत झाले आहे. बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांनी राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.