१० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाविषयी तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेऊ ! – शिक्षणमंत्री

मुंबई – १० वीच्या परीक्षा रहित करण्यात आल्या असल्या, तरी विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल ? याविषयी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत ? यांचा विचार केला जाईल. याविषयी तज्ञांशी चर्चा करून, तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी चर्चा करून याविषयीचा निर्णय घोषित करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.