७१ वर्षांत शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे न करणारे विद्यमान विरोधी पक्ष आणि मवाळ धोरणे अवलंबून शेतकरी आंदोलनाचा विषय चिघळू देणारे विद्यमान सत्ताधारी !

आज ७० दिवस झाल्यानंतरही हे आंदोलन जाणीवपूर्वक चालू ठेवले आहे. ‘देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने अशी आंदोलने कठोरपणे मोडून काढावीत.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अधिवक्त्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र !

अनेक वेळा शासनाकडे लिखित मागणी करूनही पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूरकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील अधिवक्ता विजयकुमार नागटिळक यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे.

पुणे येथील भूमी खरेदी-विक्री करणार्‍या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या दोघांना अटक !

जीवे मारण्यासाठी ५० लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धमकी देऊन जमीन खरेदी-विक्री करणार्‍या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या सागर दत्तात्रय फडतरे आणि गणेश दत्तात्रय फडतरे या दोघांना अमली पदार्थ अन् खंडणीविरोधी पथकाने..

नागपूर येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी सुरक्षिततेच्या कारणास्तव इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी दिली.

सहस्रो लोक विनामास्क फिरत असतील, तर दळणवळण बंदी टाळताच येणार नाही ! – आयुक्त इक्बालसिंह चहल 

मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

शिवसेनेचे ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे (वय ६६ वर्षे) यांचे २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर मागील दोन मासांपासून उपचार चालू होते.

पिंपरी (पुणे) येथे घरगुती गॅसची चोरी करणार्‍या टोळीला अटक, ३८१ सिलिंडर जप्त

पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती गॅसची चोरी करणार्‍या टोळीला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी कारवाईमध्ये एकूण ३८१ गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या..

राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात शिवजयंती ‘स्वराज्यदिन’ म्हणून साजरी करण्यात येईल !

माझ्या अखत्यारीत येणार्‍या महाविद्यालयांत पुढील वर्षापासून शिवजयंती ही प्रत्येक महाविद्यालयात ‘स्वराज्यदिन’ म्हणून साजरी केली जाईल. याविषयीचा आदेश काढला जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केली.

काँग्रेसचे बेगडी शेतकरीप्रेम जाणा !

झारखंडमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून ‘जन आक्रोश सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करण्यात आले, तेव्हा मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.

कोरोनाच्या संसर्गामुळे शेगाव येथील गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी बंद !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेगाव येथील संत गजानन महाराज यांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.