अधिवक्त्यांवर ही वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – अनेक वेळा शासनाकडे लिखित मागणी करूनही पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूरकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील अधिवक्ता विजयकुमार नागटिळक यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे. पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून जाणार्या सहस्रो लोकांची असुविधा होत आहे. (रस्त्याची दुरुस्ती ही प्राथमिक गरजही पूर्ण करू न शकणारे प्रशासन नागरिकांपर्यंत विविध सुविधा काय पोचवणार ? आपल्या मागणीची नोंद घ्यावी यासाठी नागरिकांना रक्ताने पत्र लिहिण्याची वेळ येते, हे स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक) पंढरपूरकडे येणार्या अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत; मात्र पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
विधानभवनाच्या वाहनतळात बेवारसपणे पडून आहेत १५ हून अधिक वाहने !