कोल्हापूर येथे चिकित्सालयातील फलकाद्वारे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्‍या ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यम, विविध ठिकाणी फलकप्रसिद्धी यांद्वारे सहस्रो लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात येत आहे.

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने हिंदु धर्म आणि समाज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांच्या वतीने रोष व्यक्त करून शरजील याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली.

घरोघरी आयुर्वेद

दही आणि गूळ हे मिश्रण शरिराचे पोषण अन् स्निग्धता निर्माण करणारे, तसेच मनाला आनंद देणारे अन् वात न्यून करणारे आहे. असे असले तरीही या मिश्रणाच्या नियमित सेवनाने जंत वा त्वचाविकार होऊ शकतात.

भोजनातून गुंगीचे औषध देऊन ९ कलाकारांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची चोरी

हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये आग

येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये ३ फेब्रुवारी या दिवशी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना लोकवस्तीजवळ घडली; मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही.

पालघर येथे ११ मुलांना विषबाधा, मुलांची प्रकृती स्थिर

पालघर येथील किरत गावात एका लग्नासाठी आलेल्या ५ ते १२ वयोगटातील मुलांना विषबाधा झाली. जेवल्यानंतर या मुलांना उलटी आणि मळमळ होण्यास आरंभ झाला.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिल्यावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

आयुष्यात आजपर्यंत भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपेक्षा या आश्रमातील चैतन्य आणि शिस्त कित्येक पटींनी अधिक असल्याचे मला प्रथमच अनुभवता आले.

कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करावे ! – खासदार उदयनराजे भोसले

प्रशासकीय मान्यता मिळालेला कराड-चिपळूण रेल्वेमार्ग लवकरात लवकर चालू करावा, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराविषयी मुंबई महापालिकेत निनावी पत्र

कंत्राटदार हातचलाखी करत असल्याचे निनावी पत्र महापालिकेत आले आहे. ‘सॅप’ प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना साहाय्य केले जात असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

गायत्री मंत्र म्हणतांना पाळायचे नियम

नाम कधी, कुठे आणि केव्हाही घेऊ शकतो; परंतु मंत्र कधीही, कुठेही आणि केव्हाही म्हणता येत नाहीत. पलंगावर बसून, सोफ्यावर बसून, दूरचित्रवाहिनी पहात, स्नान न करता, धूत वस्त्रे न घालता, येता-जाता आणि रात्री हा महान गायत्री मंत्र म्हणायचा नसतो.