कोरोना महामारीच्या काळात कर्मचार्‍यांना वेतन आणि दिवाळी बोनस देणार्‍या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाचे पंचक्रोशीतून कौतुक

कोरोना महामारीच्या काळात श्री कानिफनाथ देवस्थानकडून करण्यात आले सामाजिक कार्य

कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिर आणि श्री जोतिबा मंदिर आता ८ घंटे दर्शनासाठी खुली रहाणार

दर्शनासाठी www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पुणे येथे विमान आणि रेल्वे यांद्वारे परराज्यांतून येणार्‍या प्रवाशांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

गेल्या काही दिवसांमध्ये शहरासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, या दृष्टीने राज्य सरकारने देहली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या ४ राज्यांतून येणार्‍या नागरिकांसाठी कोरोनाची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल बंधनकारक केला आहे.

ठाणे येथील मनसेचे पदाधिकारी जमील शेख हत्याकांड प्रकरणी एक संशयित कह्यात

मनसेचे जमील शेख यांच्या हत्येच्या प्रकरणात शाहीद शेख (वय ३५ वर्षे) या संशयिताला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील हुताम्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस आणि जवान यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मरीन ड्राईव्ह येथील पोलीस परेड मैदानातील स्मारकाच्या ठिकाणी पोलीस आणि जवान यांना श्रद्धांजली वाहिली

धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे १० टक्के गरीब रुग्णांना उपचार द्यावेत ! – ग्रामविकासमंत्री

शहर आणि राज्य यांतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांना विनामूल्य उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे कृषी कायद्यांच्या विरोधात प्रखर आंदोलन

पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखल्याने आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी बॅरिकेड्स उचलून उड्डाणपुलाच्या खाली फेकून दिले. आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. देहली पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि अश्रूधूर यांचा वापर केला.

तुळशीविवाहाच्या दिवशी विद्यालयांमध्ये ‘घटनादिन’ पाळण्यास सांगितल्याने शिक्षकांमध्ये अप्रसन्नता

तुळशीविवाहाच्या दिवशी घटनादिन साजरा करण्यास सांगण्यात आला. भाजपच्या राज्यात हे अपेक्षित नाही !

‘कोरोना’रूपी भ्रष्टाचार !

लाचखोरी आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रामाणिक लोकांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजमनावर धर्मशिक्षणाचे संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी संघटित होऊन याविरोधात लढा दिला, तर यश मिळू शकते, तसेच अशा लढ्याला ईश्‍वरी अधिष्ठान असेल, तर यश निश्‍चित !

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !