गायींच्या संरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारकडून ‘गो मंत्रालया’ची स्थापना होणार

प्रत्येक राज्याने असे मंत्रालय स्थापन करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारनेच देशपातळीवर मंत्रालय स्थापन करून गो संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा !

(म्हणे) ‘जिवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षा पुरवावी !’

पणजी येथील व्ही.एम्. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी २१ एप्रिल २०२० या दिवशी ‘फेसबूक’द्वारे एक आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली होती. या प्रकरणी प्रा. सिंह यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम २९५ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली  

श्रीकृष्ण विराजमानसह ८ याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने स्वीकारून नोटीस दिली

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील श्रीगुरु गोशाळेत बनवल्या जातात शेणापासून पणत्या !

केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !

किती मुसलमान तरुणी हिंदु तरुणांशी विवाह करतात ! – रामेश्‍वर शर्मा, हंगामी  अध्यक्ष, विधानसभा, मध्यप्रदेश

पाकिस्तान आणि आय.एस्.आय.चे हस्तक ‘सीते’ला ‘रुबिया’ बनवण्याचा कट रचत आले आहेत.

देहलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा करण्यास देहली उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली !

कोरोनाच्या संकटामुळे देहली उच्च न्यायालयाने यमुना नदीच्या घाटांवर छठ पूजा करण्याची अनुमती नाकारली आहे. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही धर्माचा सण साजरा करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम जीवित रहायला हवे.  

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन

दिवाळीच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या सत्संगाला सनातनच्या कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहूर यांनी मार्गदर्शन केले.

बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर संपत राज यांना अटक

धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर संपत राज यांना अटक केली आहे. त्यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप आहे. या दंगलीत ४ जणांचा मृत्यू झाला होता.

बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू शाकिब अल् हसन यांची क्षमायाचना

हिंदूंच्या देवतेची पूजा केल्यावर धर्मांधांना त्याचा राग का येतो ?, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी हिंदूंना सांगतील का ? हिंदूंना सर्वधर्मसमभाव शिकवणारे, गांधीगिरी करण्यास सांगणारे धर्मांधांना या गोष्टी का शिकवत नाहीत ?

जे.एन्.यू.ला ‘स्वामी विवेकानंद विश्‍वविद्यालय’ असे नाव द्या !  

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने थेट नाव पालटून ते घोषित केले पाहिजे ! हिंदुद्वेषी नेहरू यांचे नाव असलेल्या सर्वच संस्थांची नावे पालटून त्यांना हिंदूंच्या संतांची नावे देण्यात यावीत. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !