केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील श्रीगुरु गोशाळेमध्ये गायीच्या शेणापासून पणत्या बनवल्या जातात. यामुळे स्थानिक प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास साहाय्य होत आहे. या माध्यमातून नैसर्गिक साधनांचा वापर करत नवनवीन वस्तू बनवण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळत आहे. यांमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोचत नाही.
‘आत्मनिर्भर भारत’ से प्रेरित होकर दीवाली के मौके पर श्री गुरु गौशाला द्वारा गाय के गोबर के दीये और मूर्ति बनाए जा रहे हैं. https://t.co/eYscu8rcQZ
— NDTV India (@ndtvindia) November 11, 2020
छत्तीसगडच्या कोंडागाव येथील रहिवासी अशोक चक्रधारी यांनी २४ ते ४० घंट्यांपर्यंत जळणारा मातीचा दिवा बनवला आहे. चक्रधारी यांनी सांगितले की, यावर्षी नवरात्रीत त्यांना कुणीतरी दूरभाष करून ‘तुम्ही जशी पणती बनवली आहे, तशीच पणती आम्हाला बनवून हवी’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी बनवलेली पणती पुष्कळ प्रसिद्ध झाली. तेव्हापासून ते प्रतिदिन ५० ते ६० पणत्या बनवत आहेत. या पणत्यांचे मूल्य २०० ते २५० रुपये इतके आहे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत