चिपी विमानतळाच्या नामकरणावरून वाद !

येत्या २६ जानेवारी २०२१ या दिवशी वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी केंद्रस्तरावरून, तसेच स्थानिक नेतेही सांगत आहे. या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर या विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद चालू झाला आहे.

पाक सरकारकडून राजधानी इस्लामाबादमध्ये हिंदु मंदिर उभारण्याला अनुमती

पाक सरकारने केवळ अनुमती देऊन थांबू नये, तर त्याचे बांधकाम करतांना आणि मंदिर उभारल्यावरही त्या रक्षणासाठी कायमस्वरूपी सशस्त्र बंदोबस्त करावा, असेच हिंदूंना वाटते !

अमेरिकेतील विद्यापिठामध्ये हिंदु धर्म आणि जैन पंथ यांच्या अभ्यासासाठी पिठाची स्थापना !

अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयी अभ्यास केला जातो आणि त्यासाठी पिठाची स्थापना केली जाते. भारतात मात्र शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर कथित निधर्मीवादी, बुद्धीवादी आणि पुरोगामी याला विरोध करतात !

काश्मीरमध्ये भाजप प्रथमच जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत ३ जागांवर विजयी, तर ५४ ठिकाणी घेतली आघाडी !

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला प्रथमच ३ जागांवर विजय मिळाला आहे, तसेच यात ५४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर गुपकर आघाडीचे उमेदवार ९५ जागांवर आघाडीवर आहेत.

अलिगड मुस्लिम विश्‍वविद्यालय म्हणजे ‘छोटा भारत’ ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांना जे वाटते ते या विश्‍वविद्यालयातील काही धर्मांध विद्यार्थ्यांना वाटत नाही. अशांचा बंदोबस्त व्हायला हवा !

अवैध मद्याची वाहतूक करणारे राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या वाहनाला धडक देऊन पसार

अवैध मद्याची वाहतूक करणार्‍यांची मजल कुठपर्यंत गेली, हे राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे अन्यथा वाळू तस्करी करणारे जसे महसूल अधिकार्‍यांवर प्राणघातक आक्रमणे करतात, तशी वेळ त्यांच्यावर आल्यास आश्‍चर्य ते काय ?

मुरगाव शहराला दिलेले वास्को-द-गामा नाव आणि विविध सार्वजनिक ठिकाणांना दिलेली पोर्तुगीज नावे पालटावी ! – भारतमाता की जय संघटना

गेल्या ६० वर्षांत हा पालट झालेला नसणे गोमंतकियांसाठी दुर्दैवी ! टी.बी. कुन्हा यांनी म्हटल्याप्रमाणे ‘गोंमतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ तो हाच !

अफजलखान वधाच्या दिवशी ट्विटरवरील #ShivPratapDin हॅशटॅग ट्रेंड चौथ्या स्थानी !

या ट्रेंडमध्ये धर्मप्रेमींनी ‘वर्तमानस्थितीत आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.

‘गटार आणि रस्ते’ यांच्या पलीकडे जाऊन मानवाच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पायाभूत सुविधांच्या विकासावरच भर देण्याऐवजी मानवाच्या विकासाकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना केले.

आयुर्वेद संशोधन प्रकल्प आडाळी एम्.आय.डी.सी. येथेच होणार ! – खासदार विनायक राऊत, शिवसेना

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम्.आय.डी.सी. येथे आयुर्वेद संशोधन प्रकल्प संमत करण्यात आला; मात्र तो लातूर येथे हालवण्याच्या हालचाली चालू होत्या. या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेद संशोधन प्रकल्प आता दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथेच होणार आहे.