शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठिंबा; मात्र बंदमध्ये व्यापारी सहभागी नाही ! – अतुल शहा, व्यापारी महासंघ

श्री. अतुल शहा यांनी पुढे म्हटले आहे की, आजपर्यंत कुठल्याच सरकारने शेतकरी हिताचा विचार केलेला दिसून येत नाही. आज या देशाचा अन्नदाता प्रचंड अडचणीत आहे आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना समृद्ध बनवणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

अवाजवी शुल्क आकारणार्‍या खासगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश

प्रक्रिया शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणार्‍या खासगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे एकही मृत्यू नाही ; रुग्णसंख्याही घटली

घटत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना केंद्रही बंद होत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण आता अत्यल्प झाला आहे.

जनता वसाहतींमध्ये रहाणार्‍या कुटुंबाला ९८ सहस्र ७८० रुपयांचे वीजदेयक !

महावितरणच्या गोंधळामुळे त्यांनी जनतेची विश्‍वासार्हता गमावली आहे.

नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ नाही ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री, काँग्रेस

स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ राज्य केलेल्या काँग्रेसने त्या त्या वेळी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवले असते, तर शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती !

पुण्यातील नोबेल रुग्णालयात रशियन बनावटीच्या लसीची दुसर्‍या टप्प्यातील चाचणी चालू

‘गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इपीडेमीओलॉजी अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजी’ आणि ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ (आर्.डी.आय.एफ्.) हे एकत्रितरित्या ‘स्फुटनिक-५’ ही लस सिद्ध करत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात १३५ पाणीपुरवठा योजना रखडल्या !

राजकीय साठमारीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना प्रलंबित रहात असतील, तर जनतेच्या कराची होणारी उधळपट्टी कधीच थांबणार नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात आलेल्या माहितीदर्शक फलकांवर व्याकरणाच्या अनेक चुका !

पाट्याटाकूपणे काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करणे आवश्यक !

केरळमधील जैव तंत्रज्ञान संस्थेच्या परिसराला पू. गोळवलकर गुरुजी यांचे नाव देण्याचा निर्णय

राज्यातील राजीव गांधी सेंटर फॉर बॉयोटेक्नॉलॉजी संस्थेच्या परिसराला द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांचे नाव देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा राज्यातील साम्यवादी सरकार आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांनी विरोध चालू केला आहे.

चीन हवामानात पालट करून भारतात अतीवृष्टी किंवा हिमवृष्टी करण्याच्या प्रयत्नात !

चीन भारतासह अन्य शेजारी देशांना त्रास देण्यासाठी आता नवी योजना आखत आहे. चीन रासायनिक रॉकेटचा आकाशात स्फोट करून हवामानात पालट करण्याच्या प्रयत्नात आहे. याद्वारे कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे असा प्रयत्न असणार आहे. यामुळे शेजारी देशांमध्ये मोठे पूर आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे.