शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – गिरीश महाजन, पर्यटनमंत्री

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात म्हणजे शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.

संत बाळूमामा देवस्थानाचे मंदिर सरकारीकरण करू नये !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानात ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा करावी; मात्र या प्रकरणाचे निमित्त करून मंदिराचे सरकारीकरण करू नये

केंद्र आणि राज्य सरकार यांची कामे ‘शिवदूत’ बनून जनतेपर्यंत पोचवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला महासत्ता बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्याला लोकसभेसाठी ४०० हून अधिक जागा जिंकून आणण्याचे ध्येय दिले असून महाराष्ट्रात आपल्याला ४५ हून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत.

‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वार्षिक पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वडिलांचे निधन

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचे १६ फेब्रुवारी या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाचा विभाग अधिकार्‍यांना घेराव !

‘अनधिकृत मशिदीवर कारवाई करा’, हे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना का सांगावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? या प्रकरणात निष्क्रीय रहाणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

पिंपरी येथील ‘क्रिएटिव्ह अकॅडमी’चे अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडले !

ही कारवाई खरेतर महापालिकेकडून यापूर्वीच होणे अपेक्षित आहे !

हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात ओढणारा भोंदू पीरबाबा नदीम शेख पोलिसांच्या कह्यात !

विविध प्रकारे सातत्याने हिंदु युवतींची होणारी फसवणूक पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरविरोधी कठोर कायद्या’ची आवश्यकता आहे, हेच लक्षात येते !

‘सगेसोयरे’ची अधिसूचना लागू झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही ! – मनोज जरांगे पाटील

‘मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे संबंधीच्या अधिसूचनेची कार्यवाही झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही’, असा ठाम निर्धार मराठा समाजाचे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केला.

अखिल भाविक वारकरी मंडळाकडून पंढरपूर येथे सोमवारी ठिय्या आणि भजन आंदोलन ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

अखिल भाविक वारकरी मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या संदर्भातील लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे देऊनही वारकर्‍यांना हा त्रास प्रत्येक ३ मासांनंतर होणार्‍या वारीसाठी सहन करावा लागत आहे