जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त करण्यासाठी प्रथम पाकला संपवले पाहिजे, हे सरकारने जाणावे !

तुमच्या मागे साप दिसला, तर तो शेजार्‍यालाच नाही, तर तुम्हालाही दंश करील !

जग मूर्ख नाही. आज जग पाकिस्तानकडे आतंकवादाचे केंद्र म्हणून पहात आहे. पाकिस्तानला योग्य सल्ला आवडत नाही; पण तरीही माझा सल्ला आहे की, तुम्ही आतंकवाद सोडून चांगले शेजारी बनण्याचा प्रयत्न करा.

भारतातील गुंड बबलू श्रीवास्तव याच्याकडून हाफीज सईद याला ठार मारण्याचा प्रयत्न ! – पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप

बबलू श्रीवास्तव सध्या उत्तरप्रदेशातील बरेली येथील कारावासात आहे. बबलू भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हस्तक असल्याचा दावाही सनाउल्लाह यांनी केला आहे.

चीनकडून त्याच्या नागरिकांना अफगाणिस्तान त्वरित सोडण्याची सूचना

काबुलमध्ये चिनी हॉटेलवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आक्रमणाचा परिणाम !

गेल्या ३ वर्षांत ९ काश्मिरी हिंदूंची आतंकवाद्यांकडून हत्या

३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

जमशेदपूर (झारखंड) येथील गुरुद्वारामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणारे भित्तीपत्रक प्रसारित

पंजाबमधील खलिस्तानी आतंकवाद्यांची कीड आता अन्य राज्यांतही पसरू लागली आहे. याचा मोठा परिणाम भोगायला लागण्यापूर्वीच अशा प्रवृत्तीला ठेचायला हवे !

राजकीय सोयीसाठी आतंकवाद्यांचे ‘चांगले किंवा वाईट’, असे वर्गीकरण करण्याचे युग संपले पाहिजे !

आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.

आतंकवाद जोपासणार्‍या देशांवर जागतिक दबाव हवा ! – एस्. जयशंकर

आतंकवाद हा कोणत्याही देशाचा हक्क आहे, असे आपण कधीही मानू नये. आतंकवाद संपेपर्यंत आमचा लढा चालूच राहील. आतंकवाद जोपासणार्‍या देशांवर जागतिक दबाव असायला हवा.

(म्हणे) ‘भारतातील हिंदू संपत असल्याने आम्ही मुंबई येथे आक्रमणे करू !’

‘हॅलो, मुंबई कंट्रोल रूम, भारतातील हिंदू संपत चालले आहेत. आता आम्ही मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर आणि कुर्ला येथे येऊन आक्रमणे करणार आहोत. घोडबंदरमार्गे मुंबईत येऊ’, अशी भ्रमणभाषद्वारे पोलिसांना धमकी दिली.

इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होणार्‍या मालदीवमधील तरुणांना अटक

भारतातून पसार झालेला आणि जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणाऱ्या डॉ. झाकीरच्या भाषणांमुळे ‘प्रभावित’ झालेले मालदीवमधील १०० हून अधिक मुसलमान तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.