राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेची अधिकाऱ्यांकडून केली जाणारी पडताळणी बंदच !

यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील स्थापत्य अधिकारी, वाहतूक व्यवस्थापक आणि कामगार अधिकारी या अधिकाऱ्यांकडून बसस्थानकांच्या स्वच्छतेची वेळोवेळी पडताळणी करण्याची कार्यपद्धती होती. सध्या मात्र ही पडताळणी बंद आहे, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

एस्.टी.ला ३४ सहस्र नवीन तिकिटे देणारी यंत्रे मिळणार !

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एस्.टी.ने ‘इबिक्स कॅश’ आस्थापनासमवेत नवा करार केला असून लवकरच ३४ सहस्र नवीन तिकिटे देणारी यंत्रे मिळणार आहेत.

प्रशासनाने रत्नागिरी बसस्थानकावरील खड्डे बुजवले, प्रवेशद्वारावरील सांडपाण्याचीही लावली योग्य विल्हेवाट !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम ! यापुढेही प्रतिदिन बसस्थानकाची स्वच्छता राहील, अशी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी आणि ज्या प्रवाशांकडून अस्वच्छता होते, त्यांना दंड ठोठावयाला हवा. असे केल्यास येथील स्वच्छता टिकून राहील !

श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानकच नाही !

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुसज्ज अशी बसस्थानके आहेत; मात्र श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानक नसल्यामुळे प्रवासी, भाविक, महिला आणि बालके यांना रस्त्यावरच एस्.टी.च्या गाडीची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागते.

#Exclusive : तुटलेली आसने, भिंतींची पडझड यांमुळे दापोली (रत्नागिरी) बसस्थानकाची दुरवस्था !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल.

माजी आमदार अनुसया खेडकरसह १८ जणांना ५ वर्षे सक्तमजुरी !

७ जून २००८ या दिवशी शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसया खेडकर आणि त्यांचे पुत्र महेश खेडकर यांच्यासह १७ जणांनी हिंसक आंदोलन करून राज्य परिवहन मंडळाच्या ८ बसगाड्यांची हानी केली होती.

राज्यातील १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांनापुढे सादर !

‘स्वच्छतामोहीम हाती घेऊन ४ मास झाले, तरी बसस्थानकांवर इतकी अस्वच्छता असेल, तर राज्यात बसस्थानक स्वच्छता मोहीम खरोखरच राबवली जात आहे का ?’ याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

#Exclusive : स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील नवीन शेड झाली मद्यपींचा अड्डा !

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त !

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

#Exclusive : उघड्यावर टाकण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे सातारा बसस्थानकात झाला आहे उकिरडा !

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.