वाहनांच्‍या ‘हेडलाईट’मध्‍ये नियमबाह्य पालट करणार्‍यांवर कारवाई करावी ! – महाराष्‍ट्र परिवहन आयुक्तांचा आदेश

काही वाहनचालक गाड्यांच्‍या हेडलाईटमध्‍ये डोळ्‍यांना त्रासदायक होतील अशा पद्धतीने दिवे बसवतात. त्‍यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्‍यात अपघाताच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत.

गणेशोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर येथून २४५ एस्.टी. गाड्या जाणार ! – पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी

संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत येणार्‍या ८ ठिकाणांच्या अंतर्गत ४ ठिकाणी पहिल्या टप्प्यात ही उभारणी करण्यात येत आहे. यानंतर कन्नड आणि गंगापूर येथे उभारण्यात येणार आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : छताचे प्लास्टर कोसळून तरुणाचा मृत्यू; एस्.टी.च्या ताफ्यात २ सहस्र ४७५ नव्या बसगाड्या !…

भिवंडी येथील कारिवली भागातील घरामधील छताचे प्लास्टर अंगावर पडून किसन पटेल (वय १७ वर्षे) याचा मृत्यू झाला. ४ मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील एका सदनिकेत किसन त्याच्या कुटुंबासमवेत भाड्याने वास्तव्यास होता.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : परीक्षेला जाणार्‍या तरुणीचा अपघाती मृत्यू !; अपघातात होरपळून दोघांचा मृत्यू !…

भावासमवेत दुचाकीवरून बँकिंगच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जात असलेल्या प्रियंका मानकर (वय २६ वर्षे) हिचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला, तर तिचा भाऊ योगेश आवारे गंभीर घायाळ झाला.

‘एस्.टी.’ची कोल्‍हापूर-मुंबई आणि कोल्‍हापूर-शिर्डी शयनयान बससेवा चालू !

‘एस्.टी.’च्‍या कोल्‍हापूर विभागासाठी ६ नवीन शयनयान (स्‍लीपर) गाड्या प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्‍यांपैकी प्रतिदिन कोल्‍हापूर-बोरीवली (रात्री ८.३० वाजता), कोल्‍हापूर-मुंबई (रात्री ९.३० वाजता), तसेच कोल्‍हापूर-शिर्डी (रात्री ८ वाजता) या गाड्या चालू करण्‍यात आल्‍या आहेत.

सिंधुदुर्गातून एस्.टी.च्या लांब पल्ल्यासाठी धावणार्‍या शयनयान बसची सेवा बंद

राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून लांब पल्ल्याच्या मार्गावर चालू करण्यात आलेल्या शयनयान बससेवा बंद करण्यात आली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘कॅमलिन’चे दांडेकर यांचे निधन !; मशिपूर (धुळे) येथे दुचाकीची महिलेला जोरदार धडक !…

‘कॅमलिन’ या सुप्रसिद्ध आस्थापनाचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे १५ जुलै या दिवशी पहाटे निधन झाले. अनेक मराठी उद्योजकांना त्यांनी बळ दिले आणि सहस्रो मराठी तरुणांना नोकर्‍या दिल्या.

आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’च्या २५० अधिक गाड्यांचे नियोजन !

भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने २५० अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. १३ ते २२ जुलै या कालावधीत या गाड्या प्राधान्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गारगोटी, मलकापूर या, तसेच अन्य आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.

अधिकोषातील भ्रष्टाचारप्रकरणी सदावर्ते पती-पत्नीला त्वरित अटक करा !

एस्.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची मागणी

‘एस्.टी.’चा प्रवास !

एस्.टी.च्‍या सेवाभावी उपक्रमातील त्रुटी दूर करून ग्राहकांचा प्रवास सुलभ होण्‍यासाठी प्रवासी प्रतीक्षेत आहेत !