…तर हिंदु समाजाला कुणीही रोखू शकणार नाही !
‘सकल हिंदु समाज’ अशा व्यापक शीर्षकाखाली हिंदूंचा मोर्चा २९ जानेवारी या दिवशी मुंबईत पार पडला. हा पहिला मोर्चा नाही आणि शेवटचाही असणार नाही. शांततामय वातावरणात पार पडलेल्या सकल मराठा मोर्चानंतर ‘आपल्याकडे अशा प्रकारे मोर्चा निघू शकतो’, हे यावरून पुनश्च अधोरेखित झाले.