गोव्यात १२ जूनपासून दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स प्रारंभ !

या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा ?’, याविषयी दिशादर्शन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अमित शहा यांचे त्यागपत्र मागणे आवश्यक झाले आहे ! – भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने आणि तरीही प्रतिदिन एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागपत्र देण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे.

पाकचे ३ तुकडे झाल्यावर इम्रान खान अमेरिकेकडे राजकीय आश्रय मागतील ! – तस्लिमा नसरीन

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वाटते की, पाकिस्तानचे ३ तुकडे होतील. एक भाग भारतात जाईल, दुसरा भाग अफगाणिस्तानात जाईल आणि तिसरा भाग स्वतंत्र बलुचिस्तान म्हणून अस्तित्वात येईल.

(म्हणे) ‘लिंग आणि योनी यांची पूजा करून देशाला नष्ट करत आहेत हिंदू !’

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवणे अक्षम्य आहे. पोलिसांनी अशांवर स्वत:हून कठोर कारवाई करायला हवी !

केंद्र सरकार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या गुन्ह्यात लवकरच अटक करणार ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लवकरच अटक होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. केंद्राने सर्व यंत्रणांना त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

प्रत्येक प्रकरणात किमान १० याचिकाकर्ते असल्याने आमचा न्यायालयीन लढा चालूच रहाणार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

विविध मशिदींच्या विरोधात चालू असलेल्या न्यायालयीन लढ्यांमध्ये केवळ ‘विश्व वेदिक सनातन संघ’ हे याचिकाकर्ता नसून अन्यही अनेक याचिकाकर्ते आहेत. त्यांचे वकीलपत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही धर्मासाठीचा हा लढा लढत राहू,

भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ८.७ टक्के वाढ ! – केंद्र

प्रत्यक्षात केंद्रशासनाने उत्पादनाचा आकडा हा ८.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता

आमच्या कार्यसूचीमध्ये काशी आणि मथुरा येथील मंदिरांचा विषय नाही ! – भाजप

काशी आणि मुथरा येथील मंदिरे हिंदूंची तीर्थस्थळे असल्याने धर्माभिमानी हिंदू ती मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतील आणि यशस्वीही होतील !

‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थिनीचा साम्यवादी विद्यार्थ्याकडून विनयभंग

साम्यवादी इतर वेळी स्त्रीमुक्ती आणि स्त्रियांचे हक्क यांविषयी गप्पा मारतात; मात्र ‘त्यांचे कार्यकर्ते स्त्रियांचे कसे शोषण करतात ?’, हेच यातून दिसून येते !

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिमाह ४ सहस्र रुपये !

अनाथ झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे, त्यांना साहाय्य केले जाईल. त्यांना प्रतिमाह ४ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.