शहजाद अंसारी याने ‘रवींद्र’ बनून हिंदु महिलेशी ७ वर्षांपूर्वी केला विवाह !

  • देहलीतील ‘लव्ह जिहाद’ची घटना

  • पती ‘मुसलमान’ असल्याचे आता समोर आल्यानंतर तिला काढले घराबाहेर !

देहली – येथे मजुरीचे काम करणार्‍या शहजाद अंसारी याने स्वत:चे नाव ‘रवींद्र’ सांगून एका हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि हिंदु पद्धतीनुसार मंदिरामध्ये ७ वर्षांपूर्वी विवाह केला. पुढे तो तिच्या माहेरीच तिच्यासमवेत राहू लागला. ७ वर्षांनी तो झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी परतला. त्याची हिंदु पत्नीही त्याच्या घरी गेली. तेव्हा तिला तो मुसलमान असल्याचे समजले. यानंतर त्याने तिला मारहाण करून घराबाहेर काढले. महिला गढवा येथे पळून आली असून ती पोलिसांत न्याय मिळण्याची मागणी करत आहे. सध्या तिला रेल्वेस्थानकावर दिवस काढावे लागत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मुळाशी उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात केवळ काही भाजपशासित  राज्यांमध्येच कायदा आहे. आता अशा घटनांमधून हा कायदा राष्ट्रव्यापी होण्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! हिंदूंनी केंद्र सरकारवर यासंदर्भात त्वरित कठोर कायदा करण्यासाठी वैध मार्गाने दबाव निर्माण करावा !