स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला १० ‘इलेक्ट्रिक केटल्स’ सुपुर्द

जिल्ह्यात वाढती कोरोनाबाधित रुग्ण संख्या लक्षात घेऊन येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेली १० विद्युत् किटली (इलेक्ट्रिक केटल्स) जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

सांगली महापालिका क्षेत्रात दळणवळण बंदीच्या पहाणीसाठी २३ पथके सिद्ध

सांगली महापालिका क्षेत्रात कडक दळणवळण बंदी चालू झाली आहे. ३० जुलैपर्यंत शहरातील बाजारपेठा, दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स बंद रहाणार आहेत. कडक कार्यवाहीसाठी महापालिकेची २३ पथके सिद्ध केल्याची माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे.

चिपळूण येथे मास्क न वापरणार्‍या २३६ जणांवर कारवाई : १ लाख १८ सहस्र रुपयांचा दंड वसूल

प्रशासनाने मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. येथील बाजारपेठेत विनामास्क फिरणारे आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणारे अशा २३६ जणांवर नगरपरिषदेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली.

आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि मालवणमधील त्यांचे कार्यकर्ते यांचे कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि आमदार नाईक यांचे कार्यकर्ते यांच्या कोरोनाशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या.

कोरोनाच्या काळातही देशाचा विकास थांबला नाही ! – पंतप्रधान

मणिपूर येथे २३ जुलै या दिवशी केंद्र सरकारच्या ‘प्रत्येक घरी पाणी’, या योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून बोलत होते. ‘हा प्रकल्प म्हणजे रक्षाबंधनानिमित्त बहिणींना भेट आहे’, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

भक्तीतील शक्ती !

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर कोरोनाच्या विनाशाला प्रारंभ होईल ! – मध्यप्रदेशचे हंगामी सभापती रामेश्‍वर शर्मा

५ ऑगस्टला अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर कोरोनाचा विनाश होण्यास प्रारंभ होईल, असे विधान मध्यप्रदेशातील हंगामी सभापती रामेश्‍वर शर्मा यांनी केले.

उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍यांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा

उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍या नागरिकांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश या देशाचे हुकूमशहा तथा राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांनी दिला. ‘या कठोर शिक्षेच्या धाकामुळे तरी नागरिकांकडून ‘मास्क’चा वापर करण्यात येईल’, असा विश्‍वास उत्तर कोरियाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाबाधितांवर उपचार करतांना कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरचा मृत्यू

एका डॉक्टरविषयी अशी असंवेदनशील असणारी रुग्णालय सर्व सामान्य जनतेशी कशी वागत असतील, हे लक्षात येते !

(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !