‘शनिगोचरा’च्या निमित्ताने चेन्नई (तमिळनाडू) येथे शनिदेव आणि वाराहीदेवी होम पार पडला !

शनिदेव आणि वाराहीदेवी होमाच्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘सर्वत्रच्या साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होऊ दे, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आयुरारोग्य लाभू दे आणि येणार्‍या आपत्काळामध्ये सर्व साधकांचे रक्षण होऊ दे’, अशी प्रार्थना केली.

कृतज्ञतेने वंदन करतो सनातनच्या गुरुपरंपरेला ।

‘सनातन धर्माची गुरुपरंपरा आद्यशंकराचार्य यांच्यापासून आतापर्यंत चालू आहे. आद्यशंकराचार्य यांच्यानंतर पृथ्वीवर झालेला भगवंताचा अवतार म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे…

सनातनच्या ३ गुरूंविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

मला व्यासपिठावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंचे दर्शन झाले. प्रत्येक दिवशी मला मधे मधे त्यांचे अस्तित्व जाणवत होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला श्री भवानीदेवीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

मोठ्यांचे सत्संग कसे असतात ? काय अर्थ आहे त्यात ? या मुलांना हे सर्व कुणी शिकवले ? ‘तळमळ असली, तर भगवंत कसा आतून शिकवतो आणि साधनेत पुढे पुढे घेऊन जातो !’, हे लक्षात येते.

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे विकृत स्वरूप प्राप्त झालेली आजची संगीत आणि नृत्यकला !

‘एकदा दौर्‍याच्या वेळी एका व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर आम्हाला दूरचित्रवाणी संचावर एक नृत्याचा कार्यक्रम पहाण्याचा योग आला. तो कार्यक्रम पाहून ‘आताची नृत्यकला किती खालच्या स्तरावर पोचली आहे’, याचे विदारक दृश्य आम्हाला पहायला मिळाले…

स्वयंसूचना दिल्यामुळे प्रसुतीचा प्रसंगही एक दैवी अनुभूती असल्याची अनुभूती घेणार्‍या चेन्नई (तमिळनाडू) येथील सौ. कृतिका एस्. !

मी स्वयंसूचना दिल्यामुळे मला वेदना होत असतांनाही मी नामजप करू शकत होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मी वेदना सहन करू शकत होते. 

व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे समवेत आहेत’, असे जाणवणे

‘एकदा मला गुरुदेवांचा सत्संग मिळाला. मी कोल्हापूर सेवाकेंद्रात व्यष्टी आणि समष्टी साधना करत असतांना मला काही मासांपासून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे ३ गुरु माझ्या समवेत असून ते मला साहाय्य करत आहेत’, असे जाणवते.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हंपी येथील ‘नववृंदावन’ या नऊ सिद्धांच्या स्थानी जाऊन घेतलेले दर्शन आणि त्यांना त्या वेळी आलेली अनुभूती

तुंगभद्रा नदीला पाहून माझा भाव जागृत झाला. मी तिला म्हटले, ‘अगं, तू प्रत्यक्ष श्रीरामाला पाहिले आहेस. त्याच्या परमप्रिय हनुमंताला पाहिले आहेस. तपोबलाने युक्त असणार्‍या अंजनीमातेला पाहिले आहेस. तुझ्या अंगाखांद्यावर प्रत्यक्ष हनुमंत खेळला आहे. अशा या जलमातेला माझा नमस्कार असो.’ मी तिचे पाणी अंगावर प्रोक्षण करून घेतले आणि तिच्या काठावर बसून तिला भावपूर्ण नमस्कार केला.  

महर्षींच्‍या आज्ञेनुसार कर्नाटकमधील ‘संडूर’ येथे कार्तिकेयाच्‍या दर्शनासाठी गेल्‍यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘इलकल’ येथील सेवा लवकर झाल्‍यामुळे आम्‍ही तिथूनच ‘संडूर’ या गावी जाण्‍याचे ठरवले. रात्र होण्‍याच्‍या आधी आम्हाला तिथे पोेचायचे होते. ‘संडूर’ येेथील कार्तिकेयाचा डोंगर फार सात्त्विक आहे. येथे गेरू नावाच्या मातीचा डोंगर आहे.  या डोंगरात खोदल्यावर आतमध्ये कार्तिकेयाचे पांढरे भस्म मिळते. हे भस्म हाताला अत्यंत मऊ लागते.

श्री. वाल्मिक भुकन

पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडेआजी यांची भावपूर्ण सेवा करणार्‍या  त्‍यांच्‍या नातसुना सौ. उर्मिला रामेश्‍वर भुकन अन्  सौ. रोहिणी वाल्‍मिक भुकन !

‘प.पू. गुरुदेवांनी आम्हाला संतसेवा करण्याचे भाग्य द़िले आहे. असे भाग्य सर्वांना मिळते असे नाही. या सेवेतून प.पू. गुरुदेव आणि पू. आजी आमची साधना करून घेत आहेत’, या भावाने दोघींनी पू. आजींची सेवा केली.