‘यूएपीए’च्या प्रक्रियेतील अनेक गोष्टींचे पालन केलेले नसल्याने तो कायदा संशयितांना लावणे पूर्णत: चुकीचे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

संशयितांवर ‘यूएपीए’ कायदा लावण्यात आला आहे; मात्र तो लावतांना ज्या अनेक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, ते करण्यात आलेले नाही. हे कलम लावतांना संपूर्ण दोषारोपपत्रात कुठेही हा गुन्हा शासनाच्या विरोधात होता, तसेच यातून देशविरोधी कारवाया होतील, असे काहीच सिद्ध होत नाही.

जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वनिष्ठ यांना गांधीहत्येसाठी उत्तरदायी धरून त्यांना संपवण्याचा घाट घातला ! – शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ता, भाजप

देश स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष १९४८ मध्ये बहुसंख्य काँग्रेस नेत्यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा होता; परंतु गांधीहत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा आधार घेत जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःला गांधींचा राजकीय वारस म्हणून प्रस्थापित केले.

श्रीक्षेत्र खातगाव (अहिल्यानगर) येथील दासनवमी उत्सवास ३ मार्चपासून प्रारंभ !

श्रीक्षेत्र खातगाव येथील श्री समर्थ रामदासस्वामी मठातील ‘दासनवमी उत्सव’ ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे, अशी माहिती ‘आनंदी नारायण कृपा न्यासा’चे कार्यकारी विश्वस्त समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांनी दिली.

बंगाल सरकारविरोधात भाजपची ठाणे आणि कल्याण येथे निदर्शने !

बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारच्या विरोधात ठाणे आणि कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने १ मार्चला निदर्शने करण्यात आली. महिलांवर अत्याचार करणार्‍या शाहनवाज शेख याला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.

तंजावर (तमिळनाडू) येथील श्री भीमस्वामी शहापूरकर मठात साजरा होणार ३४२ वा ‘दासनवमी महोत्सव’ !

तंजावर (तमिळनाडू) येथील श्री भीमस्वामी शहापूरकर मठात ४ मार्च २०२४ या दिवशी ३४२ वा ‘दासनवमी महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती तंजावर येथील ‘श्री भीमस्वामी शहापूरकर मठा’चे मठाधिपती पू. रामचंद्र महाराज शहापूरकर यांनी दिली.

कर्मचारी आणि अधिकारी यांना ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ लागू ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ नोव्हेंबर २००५ या दिवशी आणि त्यानंतर नियुक्त होणार्‍या राज्यातील कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी ’सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना’ लागू करण्याचा निर्णय १ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत घोषित केला.

महाराष्ट्र विधीमंडळाचे पुढील अधिवेशन १० जूनला मुंबई येथे !

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चला राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन १० जून २०२४ या दिवशी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी केली.

ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने ब्राह्मण समाजाकडून गुन्हा नोंद करण्याची मागणी !

योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे खेडोपाडी रहात असलेल्या अल्पसंख्य ब्राह्मण कुटुंबांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सावंत यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.

४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या वासनांधाला ५ वर्षांचा सश्रम कारावास !

वासनांधांच्या कुकृत्यांना त्यांचे नातेवाइक पाठीशी घालून एकप्रकारे अशा गुन्हेगारी कृत्यांची पाठराखण करतात. त्यामुळे अशांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे

ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्‍या व्यक्तीला अटक करा !

योगेश सावंत या व्यक्तीने ‘ब्राह्मणांना काही मिनिटांत संपवू’, असे प्रक्षोभक व्यक्तव्य केल्या प्रकरणी जळगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने ‘ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्‍या व्यक्तीला अटक करा !’ असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.