नागपूर येथे ‘वेबसिरीज’ पाहून दोघांकडून युवतीचे अपहरण !

दोघेही कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झाल्याने पैसे मिळवण्याच्या शोधात होते. त्यांनी ‘ओटीटी’वर (ओव्हर द टॉप ! चित्रपट आदी पहाण्याचे माध्यम) ‘रुद्रा’ ही गुन्हेगारीशी संबंधित ‘वेबसिरीज’ पाहिली. त्यातून अपहरण योजना आखून तसा प्रयत्न केला.

प्राध्यापकांना इंग्रजीतून शिकवण्यास सांगणार्‍या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मारहाण !

सातत्याने इंग्रजी भाषेत प्रश्न विचारून प्राध्यापकांनाही इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून शिकवण्याची विनंती करणार्‍या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे.

कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था !

कचर्‍याच्या व्यवस्थापनाच्या नियमांनुसार कचरा निर्मिती न्यून करणे, पुनर्वापर करणे आणि सुयोग्य विल्हेवाट लावणे, कचर्‍याचे स्रोत वेगळे करणे यांवर भर देण्यात आला आहे. यांव्यतिरिक्त कचरा व्यवस्थापनाचे आणि योग्य विल्हेवाटीचे दायित्व उत्पादकांवर देण्यात आले आहे.

नागपूर येथे मांजराच्या चाव्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

येथील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात रात्री ११ वर्षांच्या मुलाचा मांजराने चावा घेतला. यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. श्रेयांशु कृष्णा पेंदाम असे मृत मुलाचे नाव आहे.

‘इस्रो’त व्यवस्थापक असल्याचे खोटे सांगून सायबर चोराकडून परिचारिकेची फसवणूक !

परिचारिकेने एका विवाह संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती. अभिनव राऊतने तिच्या भ्रमणभाषवर संपर्क साधला. स्वतः इस्रोत व्यवस्थापक असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला, तसेच विवाहाचे वचन दिले.

खोट्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठवून १६ लाख ७६ सहस्र रुपयांची चोरी !

महिलेच्या विनयभंगाच्या खोट्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठवून चोरट्यांनी घरात शिरून चोरी केली आणि १६ लाख ७६ सहस्र रुपयांचा माल चोरला. अरुणकुमार श्यामानंद त्रिपाठी यांनी तक्रार दिली.

खोट्या फेसबूक खात्याद्वारे फसवणूक करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

वाढत्या सायबर चोरीवर सरकार कधी नियंत्रण आणणार ?

कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे ! – ह.भ.प. नरहरी महाराज, सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. अनेक मोहिमा वारकरी संप्रदाय आणि समितीने एकत्रितपणे राबवल्या अन् त्या यशस्वी झाल्या आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज यांनी व्यक्त केले.

अमरावती येथे बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील चिखलदराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात २ महिला आणि १ बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ३६ प्रवासी गंभीररित्या घायाळ झाले आहेत. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

सातारा वाहतूक नियंत्रण शाखेने दीड लाख रुपयांच्या सायलेन्सर आणि हॉर्नवर फिरवला बुलडोझर !

येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गत आठवड्यात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या वेळी दीड लाख रुपयांचे सायलेन्सर आणि हॉर्न शासनाधिन करण्यात आले होते. या साहित्यावर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने बुलडोझर फिरवला आहे.