सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्यांचे नाव देऊन ग्रामस्थांकडून त्यांच्या धर्मकार्याचा गौरव !

रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील ‘ब्राह्मणआळी’मधील ‘वर्तकवाडा’ या वास्तूमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्म झाला. या वास्तूकडे जाणार्‍या मार्गाचे नामकरण करण्याचा ठराव नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये एकमताने संमत करण्यात आला आहे.

कर्नाटकातील सत्तांतर !

मागील निवडणुकीत हिंदूंनी भाजपला ज्या विश्वासाने मते दिली, तो विश्वास भाजपने सार्थकी लावला नाही. त्यामुळे हिंदूंची मते विभागली गेली, तर हिजाब आणि अन्य सूत्रांमुळे भाजपला ‘खलनायक’ रंगवून काँग्रेस मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवण्यास यशस्वी झाली.

पोर्तुगिजांवर वचक ठेवणारा सार्वभौम राजा छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती संभाजीराजांच्या वधानंतर पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामधील युद्ध जवळ जवळ संपुष्टात आले; परंतु छत्रपती संभाजीराजे जिवंत असतांना पोर्तुगिजांना त्यांचा एवढा वचक वाटत होता की, ते त्यांना सार्वभौम राजा मानत होते.

नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार

‘पाव चमचा सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण अर्धी वाटी गरम पाण्यात मिसळून दिवसातून ३ – ४ वेळा प्यावे. हा उपचार ५ ते ७ दिवस करावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे केलेले विश्लेषण !

पुढील लेखात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे विश्लेषण केले आहे.

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

साधकांना संसारमायेतून निवृत्त करणारे आणि माता-पितादी सर्वस्वरूप असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !

जिवंतपणा जाणवणारे आणि चैतन्याची अनुभूती देणारे नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान !

नागोठणे ग्रामपंचायतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानासमोरील मार्गाचे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्ग’, असे नामकरण केले आहे. त्या निमित्ताने या स्थानाचे अलौकिक महत्त्व कथन करतांना पुष्कळ आनंद होत आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सुलभ आणि शास्त्रीय भाषेत अध्यात्माचा प्रसार जगभर केला !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी ३० वर्षांहून अधिक वर्षांपासून ओळखतो. माझी त्यांच्याशी ज्या-ज्या वेळी भेट होते, त्या प्रत्येक वेळी त्यांच्याकडून मला अध्यात्म, व्यक्तीमत्त्व, धार्मिकता आणि आनंद यांविषयी माहिती मिळते.

नागोठणे येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानी अनुभवलेले चैतन्य !

या वास्तूत एक प्रकारचा जिवंतपणा आहे. ‘येथील कणाकणात पुष्कळ चैतन्य ठासून भरले आहे’, असे अनुभवता येते. येथे काही वेळा आनंदाची स्पंदनेही जाणवतात आणि त्यामुळे प्रसन्न वाटते.