‘मंदिरांच्या ऐवजी रुग्णालये उभारा’, असे म्हणणे हे धर्मभावना दुखावणारे !
‘आजकाल जो तो उठतो आणि प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत किंवा सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करत आहेत, ‘भारताला मंदिरे नाही, तर केवळ रुग्णालयाची आवश्यकता आहे.’ काही अंशी ते खरेही मानले, तरी मानवतेच्या दृष्टीकोनापेक्षाही मंदिर आणि त्यापेक्षाही हिंदु धर्म यांविषयीचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन यांतून व्यक्त होतो.