सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ सहस्र २०० रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव !

आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच परिणाम !

अटकेत असलेले प्रा. हनी बाबू यांना घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली !

न्यायालयाने हनी बाबू यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल नव्याने सादर करण्यास सांगितला आहे. तोपर्यंत त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच ठेवण्याचा आदेश दिला आहे.

राज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १ सहस्र २७७ कोटी रुपयांची किमान मूल्य भावाची रक्कम थकित आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे ९१३ कोटी रुपये थकित आहेत. त्यामुळे या कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली आहे.

म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी राज्यशासनाकडून खासगी रुग्णालयांचे दर निश्‍चित !

या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यामुळे यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली. ही अधिसूचना ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू रहाणार आहे.

नागपूर येथील ‘स्कूल ऑफ स्कॉलर’ शाळेने शुल्क न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांच्या घरी पाठवला !

यामुळे ३ जून या दिवशी संतप्त पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून पालकांना कुठलाही ठोस दिलासा न मिळाल्याने पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने सरकारने वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन ‘पायी वारी’च्या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग असूनही निवडणुकांच्या कालावधीत, तसेच अन्य वेळीही अनेक वेळा सूट देण्यात आली. तरी आषाढी वारीच्या निमित्तानेही समस्त वैष्णव समाज आणि वारकरी यांच्या भावना लक्षात घेऊन याविषयी सरकारने लवकर निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करावी.

पौष्टिकतेची ऐशीतैशी !

‘नेस्ले’चे ‘६० टक्के अन्नपदार्थ आणि पेय आरोग्यासाठी पौष्टिक नाहीत’, असे वृत्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर आस्थापनानेही सांगितले की, ‘कितीही सुधारणा केल्या, तरी काही अन्नपदार्थ कधीही आरोग्यासाठी हितकारक होऊ शकत नाहीत.’

विनाअनुमती साखरपुडा आयोजित केल्याप्रकरणी रिसॉर्टसह वधू-वरांच्या विरोधात गुन्हा नोंद !

विनाअनुमती आणि ५० व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ आयोजित केल्याप्रकरणी येथील ‘कांचन रिसॉर्ट’चे मालक, वर-वधू यांच्या विरोधात ४ जून या दिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अमरावती येथे संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांवर गुन्हा नोंद !

येथे ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने भरती होत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४ सहस्र ५१ वर पोचली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात १ सहस्र ४७७ जण दगावले आहेत. असे असतांना डॉ. निकम यांनी मिरवणूक काढली.

कळवा येथे धर्मांध चोराशी झालेल्या झटापटीत महिलेचा मृत्यू 

या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून फजिल शेख या सराईत चोरट्याला अटक केली आहे.