रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे.

केरळमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप भावपूर्ण वातावरणात पार पडला

हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले. प्रवचनात हनुमानाविषयीची शास्त्रीय माहिती आणि एक सूक्ष्म प्रयोग घेण्यात आला.

आरोप-प्रत्यारोप करून सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर खापर फोडले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्र शासनाने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रहित झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात आरक्षण रहित झाल्याचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप चालू झाले असून ………

मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी ! – खासदार संभाजीराजे भोसले

न्यायालयात सर्वांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे आपण बोलू शकत नाही. मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या संदर्भात मिळून चर्चा करून काही मार्ग निघतो का ? हे पहावे.

अशोक चव्हाण यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे ! – आमदार विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम पक्ष

आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जाईल. मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा युवकांनी बलीदान दिले आहे. काँग्रेसेचे नेते अशोक चव्हाण यांना याची जाण असेल, तर त्यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली

जालना येथे ट्रकची धडक बसून रुग्णालयातून पळून जाणारा कोरोनाबाधित रुग्ण ठार !

येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेले रुग्ण राजू गायकवाड (वय ४८ वर्षे) सामान्य रुग्णालयातून कुणालाही न सांगता बाहेर पडले. ते रस्त्यावरून जात असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मराठा आरक्षण आणि कोरोनाची स्थिती यांसाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

मराठा समाजाचे आरक्षण आणि कोरोनाची स्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. या दोन्ही सूत्रांसाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

धंदा होत नसल्याने नगरपालिकेने १ वर्षाचे भाडे माफ करावे !

गेल्या वर्षभरापासून शहरातील एकमेव चौपाटी असलेली मोतीबाग बंद आहे. त्यामुळे तेथील व्यावसायिकांचे धंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले असतांना ‘नगरपालिकेचे भाडे कसे भरायचे ?’, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या नेरूळ औद्योगिक वसाहतीतील आस्थापनांवर दंडात्मक कारवाई !

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शिवाजीनगर औद्योगिक भागातील (नेरूळ) ३ आस्थापनांवर नेरूळ विभागाचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ६४ सहस्र इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर खाते बंद !

बंगालमध्ये निवडणुकानंतर झालेल्या हिंसाचाराच्या बातम्यांविषयी कंगना यांनी ‘बंगाल व्हॉयलेन्स’ या हॅशटॅगसह ‘ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण आहे’, असे ट्वीट केले होते. यावरून त्यांचे खाते बंद केल्याचे समजते.