जालना येथील व्यावसायिकांची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जालना – गेल्या वर्षभरापासून शहरातील एकमेव चौपाटी असलेली मोतीबाग बंद आहे. त्यामुळे तेथील व्यावसायिकांचे धंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले असतांना ‘नगरपालिकेचे भाडे कसे भरायचे ?’, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ‘शासनाने उदरनिर्वाह भत्ता द्यावा, अन्यथा किमान नगरपालिकेने १ वर्षाचे भाडे माफ करावे’, अशी मागणी मोतीबाग येथील व्यावसायिकांनी ४ मे या दिवशी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी संभाजी भोसले, लक्ष्मण मस्के, राम मस्के, गोपाळ चुडावन्त, अविनाश चटाले, रमेश मनसुरे आदी व्यावसायिक उपस्थित होते.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण