मराठा आरक्षण रहित केल्याचा निर्णय समाजासाठी दुर्दैवी ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रहित केले आहे. या निर्णयामुळे अन्यायग्रस्त मराठा समाजावर पुन्हा अन्यायच झाला आहे. आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मूक मोर्चे काढून मराठा समाजाने अभूतपूर्व लढा उभा केला होता……

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गायनाची सेवा करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘आता तुम्ही अक्षरब्रह्म शिकायला हवे’, असे सांगणे

संभाजीनगर येथे रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणार्‍या २ पॅथॉलॉजी लॅबचालकांना अटक

कोरोनाच्या आपत्काळात जनतेला लुटणार्‍यांना कठोर शासन करणे आवश्यक आहे, तरच इतरांवर जरब बसेल !

पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीतील धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहरातील कोरोनामुळे झालेले मृत्यू तसेच नैसर्गिक मृत्यू यांमुळे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मृतदेह मोठ्या प्रमाणात येत आहेत. मृतदेहांवर विद्युत् दाहिनी, गॅस दाहिनी समवेत पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे परिसरात धुराचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका पुष्पा टिमकर यांचे यजमान शिरीष टिमकर (६२ वर्ष) यांचे ३ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, १ मुलगा, सून, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. सनातन परिवार टिमकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

माहेश्‍वरी समाजातील डॉक्टर दांपत्याने केला लातूर येथील गोशाळेत विवाह 

शहरातील माहेश्‍वरी समाजातील डॉ. भाग्यश्री झंवर आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डॉ. सचिन चांडक यांचा विवाह येथील श्री गुरु गणेश जैन, गोशाळेत करण्यात आला. या विवाह सोहळ्यात गोशाळेत गायींना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि पंढरपूर येथे मराठा समाजाचे आंदोलन ! 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि पंढरपूर येथे मराठा समाज बांधवांनी आंदोलन केले. सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

शक्य त्या सर्व मार्गांनी मराठा आरक्षणाची भरपाई देण्याचा प्रयत्न करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मराठा बांधवांच्या प्रदीर्घ, संयमी आणि ऐतिहासिक संघर्षाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल, अशी आमची निश्‍चिती होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्यशासन पुढील भूमिका निश्‍चित करील.

राज्यातील सर्वांत मोठा संघ असलेल्या गोकुळमध्ये सत्तांतर ; महाडिक गट पराभूत 

राज्यातील सर्वांत मोठा संघ असलेल्या गोकुळमध्ये (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) सत्तांतर झाले असून महाडिक गट पराभूत झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १७ जागा मिळवल्या आहेत

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

कर्नाटक राज्य प्रशासन बेंगळुरू येथील कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला खाट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे.