सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी २६ मेअखेर वाढवली ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचे अवलोकन केल्यावर ही कडक दळणवळण बंदी २६ मेअखेर वाढवण्यात आली आहे.

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असलेले जम्मूचे पोलीस अधीक्षक श्रीधर पाटील यांनी आतंकवाद्यांची घुसखोरी हाणून पाडली !

जम्मू राज्यात आतंकवाद्यांनी पथकर नाक्यावरून घुसखोरीचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलीस आणि भारतीय सेनेच्या सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ५०० जणांचा मृत्यू

जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेशासाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

‘तौक्ते’ चक्रीवादळाचा जोर ओसरला : जिल्ह्यात ५ कोटी ७७ लाख रुपयांच्या हानीचा प्राथमिक अंदाज

चक्रीवादळामुळे कोकण  रेल्वेमार्गावरील ६ गाड्या रहित

गोव्यात दिवसभरात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५६२ नवीन रुग्ण

गोव्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या २ सहस्र ४९९ ने घटून २५ सहस्र ७५३ झाली आहे.

गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केल्याविषयी गोवा खंडपिठाने राज्यशासनाची केली प्रशंसा !

गोमेकॉतील ऑक्सिजनचा प्रश्‍न सोडवण्यास आणखी विलंब झाल्यास त्याचे पुढे पुष्कळ दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागले असते.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

भारताचे या परिषदेतील प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी बैठकीत म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणार्‍या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहे.