मुंबईमधील कुठलीही ‘केस’ सचिन वाझे यांच्याकडे जाईल, असा प्रकार चालू होता ! – देवेंद्र फडणवीस

‘क्राईम इंटेलिजन्स युनिट’ या मुंबई पोलिसांतील महत्त्वाच्या युनिटचा प्रमुख पोलीस निरीक्षक दर्जाचा व्यक्ती असतो; मात्र रातोरात त्या पदावरील व्यक्तीचे स्थानांतर करून साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जा असलेले सचिन वाझे यांच्याकडे हे पद देण्यात आले.

सातारा वाठार स्टेशन येथील आठवडा बाजार बंदचा आदेश असूनही भरवला बाजार !

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास याचे दायित्व कुणावर ? जनतेला शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षापद्धत अवलंबणेच आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

राज्यात कडक दळणवळण बंदी करण्यास भाग पाडू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने आणि नियम न पाळल्याने संसर्ग वेगाने वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. हॉटेल आणि उपाहारगृहे यांनी नियमांचे पालन करावे.

भाजपने तमिळनाडूच नव्हे, तर देशभरातील सरकारीकरण केलेली मंदिरे मुक्त करावीत ! – हिंदु जनजागृती समिती

काँग्रेस सरकारच्या काळात विविध राज्यांतील सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांतील देवनिधी लुटण्यात आला, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यात आला. मशिदी आणि चर्च यांना वगळून हिंदूंच्या मंदिरांचेच सरकारीकरण करण्यात आले. हा अन्याय दूर करण्याचा आरंभ भाजपाने करावा.

संपत्तीच्या उत्तराधिकार्‍याच्या संदर्भातील नियम सर्वांसाठी समान करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

न्यायालयाने याचिकेला तलाकसंदर्भात समान नियम बनवण्याची मागणी करणार्‍या याचिकेसह एकूण ५ याचिकांची सुनावणी एकत्रित करण्याचे ठरवले आहे.

१५० हेक्टर टिपेश्‍वर अभयारण्य जळून खाक

टिपेश्‍वर अभयारण्याला लागलेल्या आगीने १५० हेक्टर जंगल जळून नष्ट झाले. तलावाच्या मागील बांबूवनही या आगीत भस्म झाल्याने वाघांना त्यांचे स्थान पालटावे लागले, असे वनकर्मचार्‍यांनी सांगितले.

पुणे येथील उड्डाणपुलावरील हिंदी सुविचाराला मनसेने काळे फासले

हिंदीतून सुविचार लिहिण्याच्या सूचना देणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर याविषयी कारवाई करण्याचे आश्‍वासनही कक्ष अधिकार्‍यांनी दिले आहे.

पुण्यात पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसेसमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन

अनेक ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करत पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसेसमधून पुणेकर अगदी एकमेकांना चिटकून दाटीवाटीने उभे राहून प्रवास करतांनाचे चित्र दिसत आहे. अनेक बस तर अगदी प्रवाशांना दारात उभे रहाण्याची वेळ येईपर्यंत भरल्या जात आहेत.

अन्वेषणाची दिशा आणि दशा !

मुंबईत स्फोटके सापडणे आणि यामध्ये एकाचा संशयास्पद मृत्यू होणे, या प्रकरणी खरेतर महत्त्वाच्या अन्वेषण यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून गतीने अन्वेषण पूर्ण करणे अपेक्षित होते; मात्र घडले उलटेच.

१०० दिवसांत ३ सहस्र ५०० किलोमीटर पायी प्रवास करत मधुकर कुलथे यांनी पूर्ण केली नर्मदा परिक्रमा !

भाटवडगाव येथील मधुकर कुलथे यांनी सलग दुसर्‍या वर्षी ३ सहस्र ५०० किलोमीटर पायी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. कोरोनाच्या वैश्‍विक महामारीतून भारत देशासह जगाने लवकर बाहेर पडावे, तसेच अवघ्या विश्‍वाचे कल्याण व्हावे, या उद्देशाने ५ राज्यांतून ही परिक्रमा कुलथे यांनी केली आहे.