१५० हेक्टर टिपेश्‍वर अभयारण्य जळून खाक

पांढरकवडा (यवतमाळ), १४ मार्च (वार्ता.) – टिपेश्‍वर अभयारण्याला लागलेल्या आगीने १५० हेक्टर जंगल जळून नष्ट झाले. तलावाच्या मागील बांबूवनही या आगीत भस्म झाल्याने वाघांना त्यांचे स्थान पालटावे लागले, असे वनकर्मचार्‍यांनी सांगितले. ही आग विझवण्यासाठी वनविभागास ४० घंटे लागले. ही मानवी चूक असल्याची चर्चा आहे.