पुण्यातील विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या !

पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एन्.सी.एल्.) येथे पी.एच्.डी. करत असलेल्या सुदर्शन उपाख्य बाल्या बाबुराव पंडित या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे.

इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री सायकलवरून विधानभवनात जाणार !

इंधनाचे दर वाढल्याच्या निषेधार्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (१ मार्च या दिवशी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि सर्व आमदार सकाळी १० वाजता मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवन येथे जाणार आहेत.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी न केल्यास गुन्हे नोंदवण्याचे आदेश !

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी न केल्यास थेट गुन्हे नोंद करा, असे निर्देश पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले.

आता मुंडे यांचे त्यागपत्र घ्या ! – चंद्रकांत पाटील, भाजप

उद्धव ठाकरे यांनी जे केले तेच शरद पवार यांनी करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अमेरिकेत शिवराज्याभिषेक; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

अमेरिका येथील कनेक्टिकटमधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM) चमूने २० फेब्रुवारी या दिवशी शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

लंडन येथील न्यायालयाने भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांना फटकारले !

न्यायाधीश सॅम गूझी यांनी काटजू यांना फटकारता म्हटले की, या प्रकरणातील काटजू यांची भूमिका आश्‍चर्यकारक, आक्षेपार्ह आणि असंवेदनशील आहे. ‘सरकारने जाणूनबुजून माध्यमांमध्ये या प्रकरणाची राळ उडवली’, ही काटजू यांंची भूमिका आम्ही नाकारत आहोत.

श्रीराममंदिरासाठी ४४ दिवसांत २ सहस्र १०० कोटी रुपयांचे दान झाले गोळा !

जर श्रीराममंदिरासाठी खर्च झाल्यानंतर यातील पैसे शिल्लक रहाणार असतील, तर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने देशातील दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी ते पैसे व्यय करावेत, असे हिंदूंना वाटते !

धर्मांधांकडून होणारी दिशाभूल जाणा !

हिंदू आरोप करतात की, मुसलमान त्यांची लोकसंख्या वाढवून भारतावर नियंत्रण मिळवू इच्छितात; मात्र मुसलमान कधीही हिंदूंच्या लोकसंख्येच्या पुढे जाऊ शकणार नाहीत, असा दावा निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त कुरेशी यांनी केला.

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

खादी गोष्ट अल्प दिली जात असेल, तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही. केवळ समान वाटप व्हावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या.