‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ठिकठिकाणी निवेदने

नांदेड, परभणी, सांगली आणि बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) येथे ‘व्हॅलेंटाईन डे’चे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन

सज्ञानी तरुण आणि तरुणी सहमतीने विवाह करत असतील, तर पोलीस त्यांची चौकशी करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

सज्ञानी असतांनाही फूस लावून जर कुणी बलपूर्वक विवाह करण्यासाठी दबाव टाकत असेल किंवा विवाह करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने द्यावा, असे जनतेला वाटते !

राज्याला १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट

कोरोनाच्या संकटासह राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वित्तीय स्थितीविषयी सादरीकरण करतांना राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिली.

भंडारा येथील तहसीलदार निवृत्ती उइके यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

लाच घेणार्‍या गुन्हेगारांवर प्रशासन आणि पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने गुन्हेगार समाजात मनमानी पद्धतीने कारभार करतात. भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

महेश इंगळे यांचे कार्य कौतुकास्पद ! – नरेंद्र पाटील

श्री वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे आध्यात्मिक सेवेचा वसा लाभलेले व्यक्तीमत्त्व आहे. त्यांना मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून स्वामी सेवेची संधी लाभली आहे. स्वामी सेवेच्या माध्यमातून महेश इंगळे करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे नरेंद्र पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी आणि मुजोरीपणा यांमुळे जनता मेटाकुटीस ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

महाराष्ट्रात विकास होईल अशी आशा जनतेला आहे; मात्र विकास करण्याचे दायित्व ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात अथवा कारनाम्यात लिप्त आहेत.

चंद्रपूर येथे पंतप्रधान मोदी यांच्या फलकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले;  तिघांना अटक

काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या काळात किती महागाई वाढली हे पाहिले आहे का ? काँग्रेसजनांनी केलेल्या कुकृत्याचा पाढा इतका न संपणारा आहे की, त्यांच्या नेत्यांना सततच तोंड काळे करून फिरावे लागेल !

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अपप्रकार होऊ नये म्हणून बजरंग दलाची मिरज शहर आणि ग्रामीण भागात पहारा पथके !

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यकर्ते सातत्याने पहारा देत असल्याने कोणताही अनुचित प्रकार दिसून आला नाही. पोलिसांनीही यंदा शहर परिसर, दंडोबा डोंगर येथे दामिनी पथके सिद्ध ठेवली होती.

नगरपालिका उपाध्यक्ष हाजी रशीद यांसह ६ जणांना अटक

तलवारी नाचवण्याची मुजोरी धर्मांधांमध्ये किती प्रमाणात आहे, हेच यावरून लक्षात येते. ही मुजोरी नष्ट करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार ? केवळ अटक होऊन असे प्रकार थांबणार नाहीत. पोलिसांनी यासाठी केलेली कडक कारवाई सर्वांना सांगितली पाहिजे !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे, तर सरचिटणीसपदी किशोर पाटील बिनविरोध

या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सरचिटणीस यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये अधिवक्ता रचना भालके यांची निवड करण्यात आली.