नाशिकमध्ये विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करण्यार्‍यांवर पोलिसांची ड्रोन कॅमेर्‍याच्या साहाय्याने टेहळणी

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात संचारबंदीचे आदेश लागू असतांनाही येथील जुने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी परिसर अशा अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडून विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची अफवा पसरवणार्‍यास पोलिसांनी घेतले कह्यात

कोरोना विषाणूच्या संदर्भात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ध्वनीमुद्रित क्लिप सिद्ध करून अफवा पसरवणार्‍या एका संशयित व्यक्तीस येथील पोलिसांनी २६ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे…

लॅटव्हियामध्ये (युरोप) अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी साहाय्य करणार ! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील ३७ विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांचा भारतात परतण्यासाठी केंद्रशासनाशी संपर्क चालू आहे.

चंद्रपूर येथील मशिदीतून १४ मौलवी कह्यात

स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाड टाकून येथील एका मशिदीतून ११ तुर्कस्तानी, तर भारतातील अन्य भागांतील ३ अशा एकूण १४ मौलवींना कह्यात घेतले आहे…….

मशिदीत न जाता घरातच नमाजपठण करा ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे आवाहन

भारतात ठिकठिकाणी मुसलमान नियम तोडून मशिदीत जाऊन नमाजपठण करत असल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन मुसलमानांच्या धर्मगुरूंनी तात्काळ असे आवाहन करणे आवश्यक होते.

शेकडो कि.मी. अंतर चालत घरी जाणार्‍या मजुरांना साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे राज्यशासनांना निर्देश

देशात दळणवळण बंदी झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर शेकडो कि.मी. अंतर चालत जात त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे….

इराणी व्यक्ती नगर येथून पसार झाल्याप्रकरणी सिंग रेसिडेन्सी उपाहारगृहच्या मालकासह तिघांवर गुन्हा नोंद

शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या सिंग रेसिडेन्सी उपाहारगृह येथे २४ मार्च या दिवशी ईराज रेझई (वय ४८ वर्षे) या नावाची इराणी व्यक्ती स्वत:ची ओळख लपवून ६ घंटे राहून निघून गेली…….

दळणवळण बंदी असतांनाही मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद

देशात दळणवळण बंदी असतांना आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंद असतांना मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी ही माहिती दिली आहे.

दळणवळण बंदी झुगारून उत्तरप्रदेशातील मशिदींमध्ये नमाजपठणासाठी गर्दी करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद

स्वतःच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा जनताद्रोह्यांवर केवळ गुन्हा नोंद न करता सरकारने त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

दळणवळण बंदी झुगारून चारचाकी वाहनातून फिरणार्‍या गुंड पिता-पुत्राकडून पोलिसाला मारहाण

दळणवळण बंदी असतांनाही येथे चारचाकी वाहनातून फिरणारे पिता-पुत्र यांना हटकणार्‍या पोलिसाला त्या दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धनसिंह आणि त्यांचा मुलगा उमेश सिंह यांना एका पोलिसाने अडवून प्रश्‍न विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला