आक्षेपार्ह कृत्य करणारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना खडसावले म्हणून शिक्षकाला झालेल्या मारहाणीचा शिक्षक भारती संघटनेकडून निषेध

बालवयापासूनच नैतिकता शिकवणे आणि धर्मशिक्षण देणे किती अपरिहार्य आहे, हे अशा घटनांतून लक्षात येते !

गोवा विधानसभेचे आजपासून हिवाळी अधिवेशन : पहिल्या दिवशी राज्यपाल संबोधित करणार

गोवा विधानसभेच्या ४ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला २५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. चालू वर्षातील हे पहिले अधिवेशन असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सदस्यांना संबोधित करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.

म्हादई अभयारण्यातील प्रवेशबंदीची सूचना सरकारकडून मागे ! – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी एका पत्रकार परिषदेत म्हादई अभयारण्यातील प्रवेशबंदीची सूचना सरकारने २२ जानेवारीलाच मागे घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

व्हॅलेंटाईन डे’ मुळे समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम ! – ‘१४ फेब्रुवारी अँड बियाँड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उत्पल कलाल

चित्रपट क्षेत्रात ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, संस्कृतचे महत्त्व, ३७० कलम जम्मू-काश्मीरमधून हटवल्याचे लाभ, तीन तलाकचे दुष्परिणाम आदी गोष्टींविषयी प्रबोधन करणार्‍या चित्रपटांची निर्मिती झाली, हे कौतुकास्पद आहे.

ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांच्या ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त !

हिंदूंच्या संतांच्या आश्रमांवर, त्यांच्या कार्यावर टीका करतांना पैशांचा हिशोब मागणारे कधी ‘चर्च, मशिदी, मदरसे यांना पैसा कुठून मिळतो ?’, याची माहिती मागत नाहीत, हे लक्षात घ्या !

काँग्रेसवाल्यांनीच नेताजी बोस यांची हत्या घडवून आणली ! – खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

राजधानी देहलीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ?

चीनने स्वतःच्याच प्रस्तावाचे उल्लंघन करत प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर सैनिकांची संख्या वाढवली !

विश्‍वासघातकी चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता ‘ठकासी व्हावे महाठक’ या संतवचनानुसार वागणेच योग्य !

भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या ३ बँका सुरक्षित आहेत ! – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

आरबीआयने D-SIB (Domestic Systemically Important Banks) सूची प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.