बांगलादेशमध्ये मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्तींची तोडफोड आणि दागिन्यांची लूट !

पाबना (बांगलादेश)च्या शुजानगरमधील अहमदपूरमध्ये असणार्‍या काली मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्या आणि दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे.

‘आश्रम’ वेब सिरीजवरून अभिनेते बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांना न्यायालयाची नोटीस

जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी या वेब सिरीजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. ‘या सिरीजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असा आरोप त्यांनी करत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी या याचिकेत केली आहे.

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्यात गोमांस विक्रीची दुकाने बंद

गोव्यात गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोमांस विक्रीची दुकाने १२ डिसेंबरपासून बंद आहेत. नाताळाला प्रारंभ होण्यासाठी १५ दिवसच बाकी असल्याने यापुढे गोमांसाचा तुटवडा होऊ नये, यासाठी गोमांस विक्रेते जिल्हा पंचायतीची मतमोजणी झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून त्यांच्यावर दबाव आणण्याच्या सिद्धतेत आहेत.

राजस्थानच्या लाचलुचपत खात्याच्या उपअधीक्षकालाच लाच घेतांना रंगेहात अटक

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक भैरूलाल मीणा यांनाच ८० सहस्र रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गावरील अशुद्ध फलकांद्वारे मराठीची पायमल्ली करणार्‍यांवर कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे…

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कर्महिंदु बना ! – निरंजन चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

आज विविध प्रकारच्या आक्रमणांनी देव, देश आणि धर्म संकटात आले आहेत. यांचे रक्षण करायचे असेल, तर आपण केवळ जन्महिंदु असून चालणार नाही, तर कर्महिंदु बनले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी केले.

६० व्या मुक्तीदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनापासून ते गोवा मुक्तीलढ्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी निगडित भूमीचे संवर्धन केले जाणार आहे. गोमंतकियांसाठी हा एक अभिमानाचा भाग असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पर्यावरण आणि निसर्ग संपदा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत ! – सुभाष पुराणिक, वन्यजीव अधिकारी

सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे, तसेच आहे ती निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सिंधुदुर्गचे माजी साहाय्यक वनसंरक्षक आणि पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केले.

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज यांचे काम लवकरच चालू होणार ! – खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती

शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेल्या आणि मराठा आरमाराच्या प्रमुख शक्तीकेंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी अन् बुरुज यांचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. याचे काम लवकरच चालू होणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

फोंडा वीजकेंद्राची तातडीने दुरुस्ती करा ! – औद्योगिक वीजग्राहकांची मागणी

वीज केंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे (जनित्राचे) आयुष्य सरासरी २५ ते ३० वर्षांचे असते; परंतु फोंडा वीजकेंद्रातील बहुतेक ट्रान्सफॉर्मर हे ५० वर्षे जुने असून या वीजकेंद्राला मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची आणि हे वीजकेंद्र अद्ययावत् करण्याची तातडीने आवश्यकता आहे, असे औद्योगिक वीजग्राहकांचे म्हणणे आहे.