अफजलखान वधाच्या दिवशी ट्विटरवरील #ShivPratapDin हॅशटॅग ट्रेंड चौथ्या स्थानी !

या ट्रेंडमध्ये धर्मप्रेमींनी ‘वर्तमानस्थितीत आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.

‘गटार आणि रस्ते’ यांच्या पलीकडे जाऊन मानवाच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पायाभूत सुविधांच्या विकासावरच भर देण्याऐवजी मानवाच्या विकासाकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना केले.

आयुर्वेद संशोधन प्रकल्प आडाळी एम्.आय.डी.सी. येथेच होणार ! – खासदार विनायक राऊत, शिवसेना

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम्.आय.डी.सी. येथे आयुर्वेद संशोधन प्रकल्प संमत करण्यात आला; मात्र तो लातूर येथे हालवण्याच्या हालचाली चालू होत्या. या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेद संशोधन प्रकल्प आता दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथेच होणार आहे.

अमेरिकेकडून पंतप्रधान मोदी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान ‘लीजन ऑफ मेरिट’ने सन्मानित केले. हा पुरस्कार भारत आणि अमेरिका यांच्यातील रणनीतीक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला.

गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यामध्ये विधानसभा संकुलातील सभागृहात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे साहाय्य

तालुक्यातील कोंडये येथील सौ. मयुरी मंगेश तेली या ऑक्टोबर २०२० मध्ये अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेल्या होत्या. सौ. मयुरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाल्यामुळे महसूल विभागाने त्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.

नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नवीन प्रकारच्या कोरोनामुळे उपचाराची पद्धत याविषयी ‘टास्क फोर्स’ने अभ्यास करावा. नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल मंदिरातील जीर्ण झालेल्या ९ मूर्ती पालटणार

श्री विठ्ठल मंदिर आणि परिवार देवता यांमधील २८ मूर्तींतील ९ मूर्ती जीर्ण झाल्या असून त्या भंग पावल्या आहेत.

महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात सनातनच्या साधकांची पोलिसांकडून चौकशी

धर्मप्रसार करणार्‍या संस्थेच्या साधकांची चौकशी करणार्‍या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !