शिक्षक आणि एस्.टी.चे कर्मचारी यांची कोरोनाशी संबंधित चाचणी करण्यास प्रारंभ

इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास, तसेच पूर्ण प्रवासी क्षमतेने एस्.टी.ची सेवा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे एस्.टी.चे कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षक यांच्या कोरोनाशी संबधित चाचण्या जिल्हा अन् तालुका या स्तरांवर चालू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी धुळखात पडून !

शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने धुळखात पडून आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांना वाहने कुठे लावायची, असा प्रश्‍न पडत आहे.

मुंबईतील कराची स्वीट्सचं नाव पालटा !

कराची स्वीट्स या नावाने अनेक दुकानांची साखळी देशातील प्रमुख शहरे आणि महानगरे यांमध्ये आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ही दुकाने आहेत. कराची पाकिस्तानातील आहे, त्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो.

कोल्हापूर महापालिका प्रशासक पद स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पहिल्याच दिवशी लावली सर्वांना शिस्त !

विलंबाने कामावर आलेल्या कर्मचार्‍यांना कारवाईच्या नोटिसा दिल्या, तर विना‘मास्क’ कामावर आलेल्यांकडून ३ सहस्र २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका चौकातील वाहनतळात लावण्यात आलेली वाहने बाहेर काढण्यात आली.

सिंधुदुर्गात २४ घंट्यांत १२ नवीन कोरोनाबाधित

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ११५ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८०९ आहे.

२६ नोव्हेंबरला सरकारी कर्मचारी, शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार

देश कठीण आर्थिक स्थितीतून जात असतांना, लक्षावधी लोक बेरोजगारीला तोंड देत असतांना कर्मचार्‍यांनी अशा प्रकारे संप करून जनतेला आणि सरकारला नाडणे कितपत योग्य ? हक्कांसमवेत चोख कर्तव्याचा विचार कर्मचारी संघटना करतात का ?

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रात कायदा आणणार !- बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला हमी भाव दिला नाही, तर संबंधितांविरुद्ध खटला चालवण्याची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

कंगना राणावत यांना पोलिसांकडून तिसर्‍यांदा समन्स

कंगना आणि त्यांची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्या संदर्भात तिसर्‍यांदा पोलिसांनी समन्स बजावले आहे. सामाजिक माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटच्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) दत्त मंदिरात नियमांचे पालन करत भाविकांकडून दर्शन

मंदिर खुले झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्येही चैतन्यमय वातावरण पहावयास मिळाले.

बारामती मधील व्यापार्‍याच्या आत्महत्येप्रकरणी विद्यमान नगरसेवकासह ९ जणांवर गुन्हा नोंद

गुन्हा नोंद असणार्‍या नगरसेवकांचा जनतेला आधार वाटेल का ? जनतेने कोणाला निवडून द्यायचे हे ठरवायला हवे.