छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंसाठी अस्मिता, स्वाभिमान आणि प्रेरणा आहेत. गडदुर्ग हे हिंदूंचे शक्तीस्रोत आहेत. एकेकाळी मराठ्यांच्या तलवारी मोगलांची चाकरी करत होत्या; मात्र छत्रपती शिवरायांनी त्यांचा स्वाभिमान जागृत केल्यानंतर याच तलवारींनी मोगलांना पाणी पाजले. ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणेने धर्माभिमानी हिंदूंचे रक्त सळसळल्याविना रहात नाही. या एका जयघोषाने धर्मांधांना चोख उत्तर द्यायला हिंदू सिद्ध होतात.

आज शिवराय नसले, तरी त्यांच्या शौर्याचा इतिहास गडदुर्गांच्या रूपात आजही हिंदूंना प्रेरणा देत आहे. हिंदूंना त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देत आहे. ‘सर्वधर्मसमभाव’, ‘धर्मनिरपेक्षता’ आदी शब्दप्रयोगांनी हिंदूंना पद्धतशीरपणे हिंदुत्वापासून तोडण्याचा प्रयत्न होत असला, तरी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने हिंदूंचा स्वाभिमान जागृत होतो. ‘शिवराय हेच हिंदूंच्या शौर्याचे बीज आहे’, हे आता धर्मांध आणि पुरोगामी मंडळींनी हेरले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवरायांनाच धर्मनिरपेक्ष ठरवण्याचा कावा चालू करण्यात आला आहे.
चलो #मुंबई !
शिवपराक्रमाचे साक्षीदार असणाऱ्या गड-दुर्गांचे संवर्धन करण्यासाठी तसेच त्यांना इस्लामी अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी आयोजित
🚩 ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ 🚩🗓️ 3.3.2023 I दुपारी 12
⛳मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान, मुंबई.#SaveForts_From_Encroachment @saamTVnews pic.twitter.com/h7dloXbwYv— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) March 2, 2023
शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्यात हिंदुत्वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्या या शक्तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्यंत्र आहे. शिवरायांना इस्लामप्रिय दाखवण्याचेही त्यांचे षड्यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्यासाठी संघटित व्हा !
(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेणे हे सर्वांचे भाग्य ! – तनीकेल्ला भरणी
छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचे खरे राष्ट्रपिता ! – श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले
राजापूर ‘आयटीआय’मध्ये ‘शिवराज्याभिषेक पंच परिवर्तन’ उत्सव उत्साहात साजरा