|

बीजिंग (चीन) – भारताने केलेली चिनी अॅप्सवरील बंदी ही जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. चिनी अॅप्सवर बंदी घालण्यासाठी वारंवार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असून चीन याचा विरोध करत आहे. आशा आहे की, भारत त्याच्या बाजारपेठेत सर्वांना निःपक्षपातीपणे व्यवसाय करू देईल आणि भेदभाव करणार नाही, अशा शब्दांत चीनने त्याच्या ४३ अॅप्सवर भारताने घातलेल्या बंदीचा विरोध केला आहे. भारताने गेल्या काही मासांत एकूण २६८ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
China demands India to rescind a ban on mobile apps amid tensions over border standoff https://t.co/ZR69D8k56T
— TRT World (@trtworld) November 25, 2020
चीनच्या प्रवक्त्या जी रोंग यांनी भारताच्या निर्णयाचा विरोध करतांना म्हटले की, चिनी आस्थापने या आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि देशांमधील इतर नियमांचे, तसेच कायद्याचे पालन करूनच व्यवसाय करतात. चीन आणि भारत धोक्यांऐवजी एकमेकांसाठी विकासाच्या संधी आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत. दोन्ही देशांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारी संबंध पूर्वीप्रमाणे सामान्य होतील अन् दोन्ही देशांना त्याचा लाभ होईल.
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप