मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सदिच्छा भेट !

मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात चालू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री तेथे पोचले होते; मात्र तेथे त्यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली.

‘‘तुमचे योगदान जग कदापि विसरणार नाही !’’

तुमचा त्याग आणि समर्पण यांना मानाचा मुजरा आहे. तुमचे हे योगदान जग कदापि विसरणार नाही, अशा शब्दांत राज्यांतील परिचारिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौरव केला.

‘शरद पवारसाहेब, तुम्ही मद्यवाल्यांसाठी पत्र लिहिले; शेतकर्‍यांसाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा !’

‘जनसेवेमध्ये मग्न असणारे बारमालक, मद्य विक्रेते यांना मालमत्ता कर, विजेचे देयक, अबकारी कर यांमध्ये सवलत देण्याची मागणी करण्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

राष्ट्रपुरुष आणि मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची अपकीर्ती केल्याप्रकरणी पुणे येथील सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंद

राष्ट्रपुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सामाजिक माध्यमावर अपकीर्ती केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

कोरोना रुग्णांची वाढ होणार्‍या ठिकाणी दळणवळण बंदी करा !

पुण्यासह ज्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे, अशा ठिकाणी दळणवळण बंदी लागू करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ‘आम्हाला आदेश द्यायला लावू नका’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आहे.

कलम ३७० हटवण्यासाठी राज्यघटनेत पालट केले, ती गती मराठा आरक्षणाविषयीही दाखवावी ! – उद्धव ठाकरे

शहाबानो प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटी कायदा, तसेच कलम ३७० हटवणे यांसाठी केंद्रशासनाने तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली. यासाठी राज्यघटनेतही पालट केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाविषयीही दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय केंद्रशासनाने तात्काळ घ्यावा, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन आपणाला हवे ते साहाय्य करू. मराठा समाज सहनशील आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे.

आरोप-प्रत्यारोप करून सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर खापर फोडले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्र शासनाने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रहित झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात आरक्षण रहित झाल्याचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप चालू झाले असून ………

अशोक चव्हाण यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे ! – आमदार विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम पक्ष

आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जाईल. मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा युवकांनी बलीदान दिले आहे. काँग्रेसेचे नेते अशोक चव्हाण यांना याची जाण असेल, तर त्यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली

तिसऱ्या लाटेच्या वेळी प्राणवायू नसल्याचे कारण सांगता येणार नाही !

२९ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह कोरोना नियंत्रण कृतीगटातील तज्ञही सहभागी झाले होते.