(म्हणे) ‘शेतकरी उठला तर तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय रहाणार नाही !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शेतकरी आंदोलनातील भाषणांचा गोशवारा पहाता हा मोर्चा शेतकर्‍यांच्या हितासाठी होता कि केंद्र सरकार पाडण्यासाठी होता ?, आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांपैकी किती जण शेतकरी आणि किती जण साम्यवादी आहेत, याचाही शोध घ्यावा लागेल !

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षातून हकालपट्टी

नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली.

मेट्रोच्या स्थानकाजवळ राजभवनावर जाणारा मोर्चा अडवला !

सहस्रोंच्या शेतकर्‍यांचा मोर्चा राजभवनाकडे निघाला होता. तो मेट्रो स्थानकाच्या बाहेरील चौकात अडवण्यात आला. मेट्रो चौकात दुपारी ३ ते ४ या वेळेत मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

मेट्रो कारशेडविषयी अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल ! – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, कारशेड कांजूरमार्गला नेले, तर आरेपेक्षा तीनपट अधिक झाडे तोडावी लागतील. केवळ जागा पालटण्याच्या अट्टहासापोटी सहस्रो कोटींची हानी होईल.

राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करणार !

सुरक्षेच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे ?

उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत मलाही मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यावर शरद पवार बोलत होते.

दुसर्‍या टप्प्यांत पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे लसीकरण होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार, तसेच आजार असणारे अन्य राजकीय नेते यांचे लसीकरण केले जाणार आहे.

आंध्रप्रदेशामधील मंदिरांवरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजप आणि तेलुगु देसम् यांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !

राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान !

राज्यातील ३४ जिल्ह्यांत १४ सहस्र २३४ निवडणुकींसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान पार पडले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत किरकोळ अपप्रकार वगळता चुरशीने मतदान झाले.

असोदा (जिल्हा जळगाव) येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा उमेदवारांवर सौम्य लाठीमार

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला.