तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे अन् साधकांचा आधारस्तंभ असलेले डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस !

५.११.२०२० या दिवशी डोंबिवलीतील सनातन संस्थेचे साधक श्री. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. १७.११.२०२० या दिवशी त्यांचा निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

सनातनचे ग्रंथ अध्यात्मातील दीपस्तंभ ! – आमदार महेश शिंदे, शिवसेना, कोरेगाव

दीपावलीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी सनातनच्या ३०० ग्रंथांची मागणी केली आणि वरील उद्गार काढले.

हिंदूंच्या विरोधानंतर ‘जेनिश मसाले’ या उत्पादनाच्या आस्थापनाने रामायणाचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट हटवली !

विडंबन करणार्‍या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !

प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळणार ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही – हिंदु जनजागृती समिती

अवैध आणि चिनी फटाक्यांची विक्री थांबवणे, तसेच मिठाईतील भेसळ रोखणे यांसाठी मुंबई येथे धर्मप्रेमींचे पोलिसांना निवेदन

चीनचे फटाकेही बाजारात आहेत. त्यांच्यामुळे प्रदूषण होत असल्याने ते अधिक धोकादायक आहेत. अशा फटाक्यांवर बंदी घालावी, यासाठी मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समिती, वज्रदल आणि श्रीराम गणेश मंदिर मित्र मंडळ या संघटनांनी निवेदन दिले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंगरौली (मध्यप्रदेश) येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त प्रवचनाचे आयोजन

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी शरद पौर्णिमा समवेत शास्त्रानुसार कोणती साधना करणे आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले.

हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि त्यासाठी अवतारी कार्य करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ !

विश्‍वातील अनेक समस्यांनी मानवी समाजासह अवघ्या सृष्टीला ग्रासलेले आहे. अशा वेळी ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात येते. यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे होय.

संस्कृतीरक्षण आणि धर्माचरण यांसाठी धर्मशिक्षणाचा प्रसार आवश्यक असल्याने त्यादृष्टीने कार्य करणारी हिदु जनजागृती समिती !

धर्महानी किंवा वाढते पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण याला हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे आणि त्यांचा धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करणारे विविध उपक्रम आयोजित करते.

हिंदूंच्या धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दर्शवणार्‍या कृती

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या जीवनाला ताळतंत्र राहिलेले नाही. धर्माचा पाया नसल्याने त्यांचे जीवन आधारहीन झालेले आहे. धर्मशिक्षणाअभावी भरकटलेल्या हिंदु समाजाकडून होणार्‍या अयोग्य प्रकारच्या कृती पुढे दिल्या आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे धर्माचरणास उद्युक्त करणारे विचार

धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.