सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ साहाय्य घोषित करावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जिल्ह्यातील प्रयाग चिखली येथील दौर्‍यावर असतांना ते बोलत होते.

नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

सांगली येथील आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ जुलै या दिवशी दुपारी २ वाजता ३९ फूट नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत धरण ८६ टक्के भरले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करून धरणाची….

पूरस्थितीनंतर ३२ मार्गांवर वाहतूक चालू !

यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर ४ दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही स्वत:च्या गावी सुखरूप पोचता आले आहे, अशी माहिती एस्.टी.च्या वाहतूक विभागाने दिली.

अनेक भागांत एकाच दिवसात ३२ इंच पाऊस झाल्याने पूर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोल्हापुरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन अल्प आकाराच्या मोर्‍या आहेत. बर्‍याचदा गाळ, दगड किंवा झाडे वाहून आल्यामुळे या मोर्‍या बंद होतात.

पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना आता सरपटणारे प्राणी आणि रोगराई यांची भीती !

पावसाचा जोर अल्प झाल्याने राज्यातील ग्रामीण भागात आलेला पूर ओसरला आहे; मात्र आता पूरग्रस्तांसमोर अन्य अनेक समस्या उभ्या आहेत. घरादारांतील चिखल काढत असतांना पूरग्रस्तांसमोर आता पुराच्या पाण्यासमवेत….

पूरामुळे बंद असलेला पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सर्वांसाठी खुला !

पुराचे पाणी ओसरू लागले असल्यामुळे आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांना भोजन आणि निवार्‍याची व्यवस्था जिल्हा पोलीस अन् प्रशासन यांच्या वतीने करून देण्यात आली होती.

पूरग्रस्तांना २ कोटी ५० लाख रुपयांच्या साहित्यांचे वाटप करण्यात येणार ! – शरद पवार

येत्या २ दिवसांत २ कोटी ५० लाख रुपयांचे साहाय्य गरजू लोकांना पोचवणार आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने २५० आधुनिक वैद्यांचे पथक सिद्ध करण्यात आले आहे.

पूर परिस्थितीत अडकलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

तांदूळ, डाळी आणि रॉकेल यांचा पुरवठा करण्यासमवेतच १ लाख लोकांचे स्थलांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले.

महापुरामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त !

नुकताच येऊन गेलेला महापूर आणि त्यानंतर निर्माण झालेली भीषण स्थिती ही तर आपत्काळाची झलकच आहे. यापुढे येणार्‍या महाभयंकर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने चालू करण्यात यावा. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने चालू होईल, यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या.