
सांगली – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ मित्र मंडळ चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी १५० हून अधिक व्यापार्यांनी त्यांना मिळालेले साहाय्याचे धनादेश मुख्यमंत्र्यांना परत करत असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी ‘पूरग्रस्तांना जोपर्यंत साहाय्य मिळत नाही तोपर्यंत भाजप या प्रश्नाचा पाठपुरावा करेल आणि भविष्यात तीव्र आंदोलन करेल’, असे घोषित केले. या प्रसंगी भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, हणमंतराव पवार, श्रीकांत शिंदे, दीपक माने, अविनाश मोहिते यांसह पूरग्रस्त व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण