
सांगली – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ मित्र मंडळ चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी १५० हून अधिक व्यापार्यांनी त्यांना मिळालेले साहाय्याचे धनादेश मुख्यमंत्र्यांना परत करत असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी ‘पूरग्रस्तांना जोपर्यंत साहाय्य मिळत नाही तोपर्यंत भाजप या प्रश्नाचा पाठपुरावा करेल आणि भविष्यात तीव्र आंदोलन करेल’, असे घोषित केले. या प्रसंगी भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, हणमंतराव पवार, श्रीकांत शिंदे, दीपक माने, अविनाश मोहिते यांसह पूरग्रस्त व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !